महाराष्ट्रासह देशभरात तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून, नागरिकांची प्रचंड होरपळ होत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या माहितीनुसार, महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातमध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असून, काही भागांत तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
विदर्भ-कोकणाला यलो अलर्ट
महाराष्ट्रात विदर्भ आणि कोकण भागाला सर्वाधिक फटका बसणार असून, या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत तापमान 39 ते 40 अंशांदरम्यान राहणार आहे. विशेषतः सिंधुदुर्ग, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि नागपूर येथे उष्णतेचा मोठा प्रभाव जाणवेल.
राज्यात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता
IMD च्या अंदाजानुसार, महाराष्ट्राच्या विदर्भ पट्ट्यात 14 मार्च, ओडिशात 16 मार्च, झारखंडमध्ये 16 मार्चपर्यंत, तर पश्चिम बंगालमध्ये 18 मार्च रोजी उष्णतेची तीव्र लाट जाणवण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतात वादळी वारे आणि धुळीचे वादळ
उत्तर भारतातही तापमान वाढत असून, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार या भागांत पुढील आठवडाभरात जोरदार वारे आणि धुळीच्या वादळाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईकरांना दमट हवामानाचा त्रास
मुंबईतही उष्णतेचा प्रभाव जाणवणार असून, किनारपट्टी भागातील नागरिकांना दमट हवामानाचा मोठा फटका बसणार आहे.
मे महिन्यात उष्णतेचा कडाका अधिक तीव्र होणार
सध्याच्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर, मे महिन्यात उष्णतेचा कहर अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, जास्त वेळ उन्हात राहणे टाळावे आणि भरपूर पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.