महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महायुती सरकारने सामान्य नागरिकांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत या निर्णयाची घोषणा केली.
राज्यात सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळणार आहे. यापुढे साध्या कागदावर स्वसाक्षांकित (Self-Attested) अर्ज लिहून तहसील कार्यालयातून प्रमाणपत्र मिळणार आहे.
विद्यार्थ्यांसह नागरिकांना होणार मोठा फायदा
दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना अनेक प्रमाणपत्रांसाठी प्रतिज्ञापत्रांची आवश्यकता भासते. यामुळे त्यांच्यावर 3 ते 4 हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च येत होता. मात्र, नव्या निर्णयामुळे हा खर्च वाचणार आहे.
या प्रमाणपत्रांसाठी लागत होते 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क:
जात पडताळणी प्रमाणपत्र
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी प्रमाणपत्र
नॉन-क्रिमीलेयर सर्टिफिकेट
राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
शासकीय कार्यालयांमध्ये सादर करायची अन्य प्रमाणपत्रे
महायुती सरकारने यापूर्वी मुद्रांक शुल्क 100-200 रुपयांवरून 500 रुपये केले होते. मात्र, त्याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसला होता. आता हा निर्णय मागे घेतल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.