महसूल खात्याच्या सुस्त कारभारामुळे अनधिकृत वाळूच्या बार्जेसमुळे आंबेत पुलाला धोका!

Ambet Pool
महाड ( मिलिंद माने ) :
रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत पुलाखालून वाळूच्या अनधिकृत बार्जेच्या वाहतुकीमुळे पुलाला धोका निर्माण झाला असताना देखील तसेच पुलाखालून अनधिकृत बार्जेशी वाहतूक बंद करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले असताना देखील महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या व महसूल खात्याच्या आशीर्वादामुळे आंबेत पुलाची स्थिती धोकादायक झाली असून हा पूल कोसळण्याची शक्यता असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शौकत ईसाने यांनी राज्य सरकारला याबाबत लेखी पत्र पाठवून या पुलाखालून अनधिकृत बार्जेश ची वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.
रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणारा आंबेत पूल तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या कारकिर्दीत झाला होता मात्र या पुलाखालून अनधिकृत रित्या वाळूच्या बार्जेस मधून वाहतूक चालू असताना या पुलाच्या पाच नंबरच्या पिलरला धक्का लागून पुलाचा काही भाग कमकुवत झाल्याने मागील अडीच वर्ष या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली होती.
YouTube Video

 

रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत पुलावरून मागील अडीच वर्षे वाहतूक बंद केल्यानंतर या पुलाच्या डागडुजीवर सार्वजनिक बांधकाम खात्याने तब्बल 22 कोटी रुपये खर्च केले. व त्या अडीच वर्षाच्या काळात दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांची सोय व्हावी व हलक्या वाहनांसह मोठ्या वाहनांना दोन्ही जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत. जाण्याची सोय व्हावी यासाठी रोरो सेवेमार्फत आंबेत खाडीतून वाहतूक चालू होती या वाहतुकीसाठी दर महिन्याला सार्वजनिक बांधकाम विभागाने रोरोसेवेधारकाला तब्बल 80 लाख रुपये दर महिन्याला अदा केले.
रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत पुलाच्या दुरुस्तीवर करण्यात आलेला खर्च व प्रवासी वाहतूक रोरो सेवेवर करण्यात आलेला खर्च पाहता या ठिकाणी नवीन पूल त्याच खर्चात झाला असता मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या कुठल्याही खर्चाचा अंदाज न घेता जुन्या पुलाला डागडुजी केली मात्र त्यानंतर पुलाखालून रेतीने भरलेले अवजड बार्जसची वाहतूक खुलेआमपणे चालू ठेवण्यास महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड कारणीभूत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शौकत ईशाने यांचे म्हणणे आहे.
आंबेत पुलाखालून चालणाऱ्या वाळूच्या अवजडबार्जेसच्या वाहतुकीमुळे हा पूल कोणत्याही क्षणी वाळूच्या बार्जेस च्या धक्क्यामुळे पडल्यास त्याची जबाबदारी कोणाची राहील असा प्रश्न शौकत ईशाने यांनी करून याबाबत त्यांनी महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांच्यासह महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई यांच्याकडे तसेच रायगड जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले आहे. मात्र या आंबेत पुलाच्या नदीपात्रातून दोन हजार टन ब्रास भरलेले बारजेस अनधिकृत रित्या खुल्या चालू असल्याने या पुलाला या बार्जेसच्या वाहतुकीमुळे धोका निर्माण होऊ शकतो.
कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांनी महाडचे प्रांत अधिकारी ज्ञानोबा बानापुरे ांनी महाडच्या प्रांताधिकार्‍यांना याबाबत पत्रव्यवहार केला असून याबाबत या पुलाखालून वाहतूक बंद करण्याची मागणी माणगाव सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांनी देखील याबाबतचे पत्र महाडच्या प्रांताधिकार्‍यांना देऊन देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने आंबेत पुलाची स्थिती धोकादायक झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading