रायगड आणि रत्नागिरी दौऱ्यादरम्यान पालकमंत्री पदाबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट मत व्यक्त केले. दरेकर म्हणाले, “भाजप या संदर्भात योग्य निर्णय घेईल. परंतु बोलताना काळजी घेणे आवश्यक आहे. पदांसाठी रस्त्यावरचा वाद लोकांना मान्य नाही. लोकांना ते पसंत पडत नाही. त्यामुळे सगळं थांबलं पाहिजे. आपल्या नेतृत्वाने समन्वयातून मार्ग काढावा, अशी विनंती मी देवेंद्र फडणवीस साहेबांना केली आहे.”
स्नेहल जगताप यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता, दरेकर म्हणाले, “त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास स्वागतच होईल. भाजप हा चांगल्या लोकांना सामावून घेणारा पक्ष आहे. लोकांचा विकास करण्यासाठी भाजपसारखा चांगला पर्याय दुसरा नाही.”
पालकमंत्रीपदाबाबत पुढे असे ही म्हणाले, “मलाच पालकमंत्री पद हवं आहे, असं म्हणणे चुकीचं आहे. कोण मंत्री होणार, यासाठी लोकांनी जनाधार दिलेला नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी आपआपल्या वरिष्ठ नेत्यांशी योग्य पद्धतीने संवाद साधावा आणि पक्षाच्या चौकटीत निर्णय घ्यावा.” नाहीतर दोघांचं भाडण आणि तीसर्याचा लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही स्पष्ट संकेत दिले.
त्यांनी पुढे विश्वास व्यक्त केला की, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.