भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर IPL 2025 स्थगित; BCCI चा मोठा निर्णय

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर IPL 2025 स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
PEN न्यूज ऑनलाइन टीम : 
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ने IPL 2025 स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी धर्मशाला येथील स्टेडियमवर सुरु असलेला पंजाब विरुद्ध दिल्ली यांच्यातील सामना 10.1 षटकांनंतर रद्द करण्यात आला.
सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या इशाऱ्यानंतर खेळाडू आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं BCCI कडून स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढत असून पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्यांचं प्रमाण वाढलं आहे, ज्यामुळे देशभरात सतर्कता वाढवण्यात आली आहे.
आतापर्यंत आयपीएलचे अनेक सामने पार पडले असले तरी अजूनही १५ सामने शिल्लक आहेत. हे सामने पुढे कधी आणि कुठे खेळवले जातील, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading