भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या लष्करी संघर्षाला अखेर विराम

Bharat pak
नवी दिल्ली :
 मागील काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या लष्करी संघर्षाला अखेर विराम मिळाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे दोन्ही देश तात्काळ शस्त्रसंधीस तयार झाले असल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली आहे.
अलीकडील काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण होते. पाकिस्तानकडून भारतीय लष्करी आणि नागरी ठिकाणांवर रात्रीच्या वेळी हल्ले करण्यात आले होते, ज्याला भारताने तीव्र प्रत्युत्तर दिले. हा संघर्ष चिघळत चालल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात होती.
डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान:
“अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे रात्री उशिरापर्यंत चाललेल्या चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तान तात्काळ आणि पूर्णपणे शस्त्रसंधीस तयार झाले आहेत. दोन्ही देशांनी विवेक आणि समजूतदारपणाने निर्णय घेतला आहे,” असे ट्रम्प यांनी सांगितले.
कधीपासून लागू झाली शस्त्रसंधी?
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले की, भारताचे डीजीएमओ आणि पाकिस्तानचे डीजीएमओ यांच्यात १० मे रोजी दुपारी ३.३५ वाजता चर्चा झाली. त्या चर्चेच्या आधारावर १० मे रोजी संध्याकाळी ५ वाजल्यापासून जमिनीवर, हवेत आणि समुद्रातून होणारे हल्ले तात्काळ थांबवण्यात येणार आहेत. पुढील चर्चा १२ मे रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.
पाकिस्तानकडूनही दुजोरा:
पाकिस्तानचे उपपंतप्रधान व परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी ट्रम्प यांच्या घोषणेला दुजोरा दिला. “पाकिस्तान आणि भारत शस्त्रसंधी करण्यास तयार झाले आहेत. पाकिस्तानने कोणतीही तडजोड न करता प्रदेशात शांतता राखण्याचा प्रयत्न केला आहे,” असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading