भारतीय महिलांच्या 19 वर्षाखालील संघाने क्रिकेट विश्वात अभिमानास्पद कामगिरी करत सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सनी धडाकेबाज पराभव करत भारताने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली.
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 82 धावांचे लक्ष दिले होते, जे भारतीय संघाने फक्त 1 विकेट गमावून 11.2 षटकांत सहज पूर्ण केले. याआधी 2023 मध्ये शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला U-19 विश्वचषक जिंकला होता.
गोलंदाजांचा प्रभावी मारा भारतीय गोलंदाजांनी अफलातून कामगिरी करत द. आफ्रिकेला अवघ्या 82 धावांत गुंडाळले. गोंगडी त्रिशाने 3 विकेट्स, तर वैष्णवी शर्मा, आयुषी शुक्ला आणि पारुनिका सिसोदिया यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
संपूर्ण स्पर्धेत भारताची निर्विवाद सत्ता भारतीय संघाने स्पर्धेत एकतर्फी विजय मिळवत अजेय कामगिरी केली. वेस्ट इंडिज, मलेशिया, श्रीलंका, बांगलादेश, स्कॉटलंड, इंग्लंड यांसारख्या संघांना सहज पराभूत करत त्यांनी अंतिम फेरी गाठली आणि तिथेही वर्चस्व गाजवत विश्वचषक उंचावला.
भारतीय युवा महिला क्रिकेट संघाच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली आहे!
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.