वन्यजीवांचं संरक्षण व पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी भारतात काही प्राण्यांना घरात पाळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जैवविविधतेचं रक्षण व प्रजातींचं संवर्धन हे या कायद्यांचं प्रमुख उद्दिष्ट आहे. काही प्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित राहतात आणि तिथेच त्यांची आवश्यकता जास्त असते.
कुत्रा, मांजर यांसारखे प्राणी आपण पाळू शकतो, परंतु अनेक प्राणी पाळण्यावर कायदेशीर बंदी आहे. प्रशासनाकडून या नियमांचं काटेकोर पालन होत असून, बेकायदेशीर व्यापार व तस्करी रोखण्यासाठीही कठोर उपाययोजना केल्या जात आहेत.
पाळीव प्राणी म्हणून बाळगण्यास बंदी असलेल्या २० प्राण्यांची यादी:
1. साप
2. कोल्हा
3. काळं हरण
4. हत्ती
5. स्टार टर्टल (कासव)
6. सिंह
7. ओरंगउटान (वनमानव)
8. खवले मांजर
9. रानमांजर
10. लाल पांडा
11. अस्वल
12. बिबट्या
13. वाघ
14. वानर
15. लाल मुनिया
16. घुबड
17. घोरपड
18. मगर
19. मांडूळ
20. पिटबुल प्रजातीचा कुत्रा
या प्राण्यांचं संवर्धन व संरक्षण हे सरकारच्या प्राधान्यक्रमांपैकी एक आहे. काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, तर काही प्राण्यांना माणसांकडून होणाऱ्या हानीपासून सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. याशिवाय, अंधश्रद्धांमुळे अनेकदा प्राण्यांचा बळी दिला जातो, त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठीही कठोर कायदे लागू करण्यात आले आहेत.
सरकारच्या या उपाययोजनांमुळे वन्यजीवांची तस्करी व अवैध व्यापार कमी होईल, तसेच पर्यावरणाचं संतुलन राखण्यासही मदत होईल.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.