भारतामध्ये वेगाने महामार्गांचे जाळे तयार होत असून, देशातील सर्वात मोठ्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भारताचा पहिला इलेक्ट्रिक हाईवे उभारला जात आहे. हा हाईवे महाराष्ट्रातून सुरू होणाऱ्या या महत्वाच्या मार्गाचा एक भाग आहे.
1350 किलोमीटर लांबीच्या या द्रुतगती महामार्गावर इलेक्ट्रिक वाहने धावता धावताच चार्ज होणार असून, पेट्रोल-डिझेलच्या कटकटीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. विशेषतः या महामार्गावर इलेक्ट्रिक वाहने, ट्रॉलीबस आणि ट्रकसाठी स्वतंत्र लेन विकसित केली जाणार आहे.
महत्वाचे मुद्दे:
सर्वात मोठा प्रकल्प: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर 8 लेनसह दोन्ही बाजूला प्रत्येकी एक लेन इलेक्ट्रिक वाहनांसाठी असेल.
इंधनाचा पर्याय: विजेवर वाहने चालल्यामुळे पेट्रोल-डिझेलवरील खर्च कमी होईल आणि लॉजिस्टिक खर्च 70 टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.
सुपरफास्ट प्रवास: या महामार्गामुळे वेळेची मोठ्या प्रमाणावर बचत होणार असून प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होईल.
अंतरराष्ट्रीय धर्तीवर प्रकल्प: सध्या जर्मनी आणि स्वीडनमध्ये इलेक्ट्रिक हाईवे आहेत, असाच इलेक्ट्रिक हाईवे दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर उभारला जाणार आहे. या महामार्गावरील दिल्ली ते जयपुर दरम्यान हा इलेक्ट्रिक हाईवे उभारला जाणार आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली होती. इलेक्ट्रिक हाईवेच्या दोन्ही बाजूला 1.5 मीटर उंचीचे सुरक्षा अडथळे उभारले जाणार आहेत. यामुळे भारतातील वाहतुकीत मोठी क्रांती घडून येईल अशी अपेक्षा आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.