भाजपाच्या रणनीतीमुळे कोकणातील शिवसेनेला मोठा धक्का बसणार

Bjp
मुंबई (मिलिंद माने) :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांवरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पराभवामुळे पक्षातील असंतोष वाढला असून काही वरिष्ठ नेते आणि पराभूत उमेदवार भाजपामध्ये जाण्याचे संकेत देत आहेत. रत्नागिरीतील राजन साळवी, राजन तेली, आणि रायगडमधील स्नेहल जगताप हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिलपासून होणार आहेत, ज्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, आणि पालघर जिल्ह्यांत भाजपाचा वरचष्मा राहण्याचे संकेत आहेत. शिवसेनेला उमेदवार उभे करण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
फेब्रुवारी महिन्यात शिवसेनेचा “शिमगा” होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपाच्या रणनीतीमुळे कोकणातील शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading