माणसाच्या जीवनात अनेक चढ उतार येत असतात मात्र त्याला सामोरे जावे लागते आई वडिलांची सेवा हीच खरी सेवा आईचे वाढदिवसाचे अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने अनिकेत तटकरे आणि मंत्री अदिती ताई यांनी त्रिदिनी भव्य दिव्य देखणा असा अखंड अमृत कीर्तन महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर महाराष्ट्रातील राजकारणात आदर्श कुटुंब म्हणून तटकरे कुटुंबांची ओळख व आदराने त्यांच्याकडे पाहिले जात असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आवाजाचे जादुगार हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी रोहा येथील कीर्तन सेवेत केले.तर रोह्यात भक्तीचा महापूर,वरदायी कीर्तन अमृत महोत्सव जागरात खासदार सुनील तटकरे यांनी हरिपाठ कार्यक्रमात हाती टाळ घेऊन दंग होत लुटला आनंद.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे यांच्या पत्नी सौभाग्यवती वरदा तटकरे यांच्या ६१व्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोहा तालुका वारकरी संप्रदाय यांच्यावतीने वरदाई कीर्तन अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन कुंडलिका तीरावरील नदी संवर्धन येथे करण्यात आले असून यात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांची कीर्तसेवा संपन्न होत असलेल्या कार्यक्रमात सोमवारी जणू काही भक्तीचा भक्तीचा महापूर उसळला तर यावेळी दुसऱ्या दिवसाची सेवा महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आवाजाचे जादुगार हभप पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलढाणा) यांची गोड वाणीतून सर्वांना मंत्र मुग्ध करत संपन्न झाली यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले.तर प्रसंगी गायनाचार्य हभप नारायण महाराज खिल्लारी, रविंद्र मरवडे, वैभव खांडेकर,मृदुंगमणी हभप विकास महाराज बेलुकर यांनी साऱ्यांना केले मंत्र मुग्ध केले.
वारकरी संप्रदायाची वैभवशाली परंपरा लाभलेल्या रोहा तालुक्यात २० ते २२ एप्रिल या कालावधीत संपन्न होत असलेल्या धार्मिक तथा आध्यात्मिक वरदायी अमृत कीर्तन महोत्सव या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील,तालुका अध्यक्ष अनंतराव देशमुख,माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, कार्याध्यक्ष समीर शेडगे, उप नगराध्यक्ष महेंद्र दिवेकर, महेश कोलाटकर, महेंद्र गुजर, अमित उकडे, रामा म्हात्रे, प्रीतमताई पाटील, सुरेश मगर,यांसह तालुक्यातील वारकरी मंडळींनी सहभागी होऊन हरिपाठ, कीर्तनाचा लाभ घेतला. तसेच या प्रसंगी तालुक्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार,गायनाचार्य,मृदुगमणी यांचा या अमृत कीर्तन महोत्सव कार्यकात तटकरे परिवांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात येत आहे.
लेकुराचे हित । पाहे माऊलीचे चित्त ।।१।। ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रिती ।।२।।
पोटी भार वाहे । त्याचे सर्वस्वही साहे ।।३।। तुका म्हणे माझे । तुम्हा संतावरी ओझे ।।४।।
या अभंगातून आपल्या सुमधुर वाणीतून पुढे मार्गदर्शन करतांना सांगितले की संत तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की आपल्या मुलाचं हित कशात आहे, किंवा आपल्या मुलाने काय केलं तर त्याचं भविष्य उज्ज्वल घडेल, हा सर्व विचार त्याच्या आईच्या मनात नियमित रूपाने चालत असतो. आपल्या लेकरा बद्दल एवढा कळवळा फक्त माय माऊलीला असतो, अन्य कुणालाही नाही. तिच्या प्रेमात कोणतीही स्वार्थी भावना नसते म्हणुच एवढ्या कमी वयात कमी वेळेत कन्या अदिती तटकरे या दोनदा कॅबिनेट मंत्री झाल्या हे समोरचे उदाहरण आहे .
सांसारिक गाडा ओढताना कशाचीही पर्वा न करता ती आपल्या बाळाला नऊ महिने पोटात सांभाळत असते. आणि त्याच्यामुळे होणारा त्रास किंवा प्रसूती काळातील जीवघेण्या वेदना देखील ती त्याच्यावरील मायेपोटी सहन करत असते. आपल्या लेकराच ओझं तिला कधीच वाटत नाही. ते ओझ उराशी बाळगून आई जीवन जगत असते. हे सांगताना शेवटी आपल्या अभंगात तुकोबाराय सर्व संताना अनुसरून म्हणतात की जस आईचं आणि मुलाचं नात आहे. तसचं आपल्यातील नातं दृढ राहुद्या आणि इथून पुढे माझ्या संपुर्ण जबाबदारीच ओझं तुमच्या सारख्या दयानिधी संतावर आहे त्यामुळे जीवनात येऊन आपल्या आई वडील याच्यासाठी चांगले कार्य करण्यासाठी वाटचाल ही योग्य असली पाहिजे असे म्हणाले.
आपल्या मुलाबाळांचं चांगल व्हावं हे प्रत्येक माय माऊलीला वाटत असतं. आपलं मुलं हे वाईट मार्गाला जाऊ नये, ते निर्व्यसनी राहावं. याकरिता बालपणी पासून त्याला योग्य संस्कार देण्याचं काम आई ही मोठ्या हिमतीने करत असते. आपल्या मुलाचं हित कशात आहे हे तिला कळत असतं. आणि म्हणून तिच्या मनात नेहमी आपल्या लेकराच्या हिताचा विचार केला जातो. या सर्वामध्ये तिचं आपल्या लेकरा बद्दल असणार प्रेम स्पष्ट होतं. मात्र शेवटी पाटील महाराज यांनी तरुण पिढीला संदेश दिला की आपल्या आई वडिलांची, धर्माची, देशाची सेवा करा, व्यसनाधीन होऊ नका आपल्या देशाला नक्षलवादी आतंकवादी, बांगलादेश, पाकिस्तान, यांची भिती नाही जेवढी या व्यसनापासून होत चालली आहे. समवेत राहत असलेला मुस्लिम समाज यांच्या पिण्याची टक्केवारी पहिली तर फार कमी आहे परंतु दिवसेंदिवस आपली पिढी व्यसनाने बिघडली जात आहे. देश वाचवायचं असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले तर अभंगातून अधिक विवेचन करतांना सांगितले की जळजळणारा, हळहळणारा,तळतळणारा,आणि कळवलणारा अशा चार वर्गातून या अभंगाचे सुंदर विवेचन केले.
तीन दिवसापासून सुरू असलेल्या वरदायी अमृत कीर्तन महोत्सव आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहा तालुका वारकरी संप्रदाय अथक परिश्रम घेत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.