पनवेल तालुक्यातील कळंबोली येथे पोलीस दलातील कर्मचारी अमोल परशुराम म्हात्रे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे १६ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना पोलिसांच्या वसाहतीत घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांच्या घरावरच चोरट्यांनी डल्ला मारल्यामुळे सर्वसामान्यांच्या घरांचे काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.
अशी घडली घटना
अमोल म्हात्रे कळंबोलीतील सेक्टर-२ ई येथील वसाहतीत राहतात. दहा डिसेंबर रोजी त्यांच्या भावाच्या मुलीच्या वाढदिवसासाठी कुटुंब पेण(सोनखार) येथे गेले होते. ११ डिसेंबर रोजी पहाटे सहाच्या सुमारास त्यांच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूने घराचा दरवाजा उघडलेला असल्याचे सांगितले. चोरट्यांनी रात्री ८ वाजल्यापासून ते पहाटे ५.४५ या वेळेत घरफोडी केली.
चोरीला गेलेल्या वस्तू
या घरफोडीत ५ लाखांचे सोन्याचे बिस्किटे, सोन्याच्या अंगठ्या, बांगड्या, गळ्यातील चैन, मंगळसूत्र आणि देवाच्या चांदीच्या मूर्तींसह ४५ हजारांची रोख रक्कम असा एकूण १६.९५ लाखांचा ऐवज चोरीला गेला.
पोलीस दलालाही धक्का
चोरट्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरावर डल्ला मारल्याने पोलीस वसाहतीत घडलेल्या या घटना चिंताजनक असून पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.
सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न
पोलीस वसाहतच सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांच्या घरांचे काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. चोरट्यांच्या वाढत्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. कळंबोली पोलीस ठाण्याने अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
गुन्हेगारी नियंत्रणावर भर देण्याची गरज
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पोलीस कॉलनीत घडणाऱ्या चोऱ्या पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहेत. चोरट्यांनी निवृत्त पोलीस आणि गावी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या घरांना लक्ष केल्याने अशा घटनांवर नियंत्रणासाठी पोलिसांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.