जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या दुःखद घटनेविरोधात पेण येथील माजी सैनिक सामाजिक संस्थेच्या वतीने माजी सैनिकांनी शहरातील प्रमुख चौकात एकत्र येत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.
संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र ठाकूर यांनी यावेळी सांगितले की, ही हत्या हिंदूंना लक्ष करून जाणीवपूर्वक केली गेली असून भारतीय सैन्य अशी कृत्ये सहन करत नाही. भारतीय सेना याचा नक्कीच योग्य त्या मार्गाने बदला घेईल. तसेच अतिरेकी आपल्या परिसरात असल्यास स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाला तत्काळ माहिती देणे गरजेचे आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
माजी सैनिक सचिन पाटील यांनीही या क्रूर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत सांगितले की, धर्म पाहून नागरिकांची हत्या करणे अमानुष आहे. युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास आम्ही सर्व माजी सैनिक पुन्हा सीमेवर जायला तयार आहोत आणि देशाच्या रक्षणासाठी सज्ज आहोत.
या वेळी उपस्थित माजी सैनिकांनी “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, आणि “अतिरेकी हल्ल्याचा निषेध असो” अशा जोरदार घोषणा दिल्या.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.