क्षय रोग हा विषाणूजन्य आजार असून हा आजार पूर्वी गंभीर आजारात येत होता परंतू आता या आजारावर वेळेत उपचार केल्यास
हा आजार बरा होऊ शकतो यामुळे क्षयरोग दुरीकरणासाठी टी बी मुक्त पंचायत अभियान व कार्यशाळा घेऊन टी बी मुक्त ग्रामपंचायत करण्याचे आवाहन पेण येथील सौभाग्य इन हॉटेल येथे जेएसडब्ल्यू व युएसइए यांच्या सहकार्यातून तालुका आरोग्य विभागाकडून राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा प्रसंगी करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन नायब तहसिलदार प्रसाद कालेकर व जेएसडब्ल्यू संजीवनी हॉस्पीटल सीओ विश्वनाथ कोकिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आशा सेविका, आरोग्य सेविका,परिचारिका कर्मचारी, ग्रामसेवक यांना क्षय रोग मुक्त करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले तसेच क्षय रोग मुक्त करण्यासाठी राबणाऱ्या हातांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पेण तालुक्यातील ग्रामपंचायत टिबी मुक्त करण्याच्या दृष्टीने ग्रामसेवक व आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात आले असून ग्रामपंचायत हद्दीत टी बी आजाराचे रुग्ण आढळून आल्यास किंव्हा तशी लक्षणे समजून आल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी जिल्हा क्षय रोग उपचार अधिकारी सचिन जाधव तसेच पेण तालुका आरोग्य अधिकारी अपर्णा पवार यांनी कार्यक्रमा प्रसंगी मार्गदर्शन करताना केले.
या कार्यक्रमासाठी पेण तहसिलदार तानाजी शेजाळ, गटविकास अधिकारी भाऊ साहेब पोळ, प्रसाद म्हात्रे, पेण तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अपर्णा पवार, कमार्ली वैद्यकीय अधिकारी डॉ.ममता गजबे,वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक संतोष पाटील, युएसइए प्रकल्प अधिकारी प्रशांत बिराजदार आदी अधिकाऱ्यांचे सहकार्य व उपस्थीती लाभली.
सरकारी लाभ व योजना
सरकार मार्फत उच्च दर्जाचे टीबी निदान व उपचार मोफत उपलब्ध आहे.
*उपचारांदरम्यान टीबी रुग्णांना,सरकार मार्फत पौष्टिक आहारासाठी ५०० रुपये प्रति महा आर्थिक सहाय्य मिळते.
*टीबी रुग्णाच्या कुटुंबासाठी मोफत प्रतिबंधात्मक संरक्षण मिळते.
*टीबी उपचार घेत असताना इतर आजरांच्या उपचारासाठी मदत मिळते.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.