शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही पालकमंत्रिपद वाटपावरून नाराजी दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना स्वजिल्ह्यांऐवजी शेकडो किलोमीटर दूर असलेल्या जिल्ह्यांची जबाबदारी दिल्याने पक्षातील नाराजी वाढली आहे.
अजित पवारांनी स्वत:पुरते आणि सुनील तटकरे यांनी लेकीपुरते पाहिले, असा आरोप होत असून पक्षातील इतर मंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यांसाठी प्रयत्न न केल्याची भावना व्यक्त केली जात आहे. भाजप आणि शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादीत स्वजिल्हा मिळण्याचे प्रमाण कमी आहे.
सध्या भाजपच्या 20 पैकी 7 आणि शिवसेनेच्या 12 पैकी 7 मंत्र्यांना स्वजिल्हा मिळाला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 मंत्र्यांपैकी फक्त उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच स्वजिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. आदिती तटकरे यांना स्वजिल्हा मिळाला असला तरी त्यावरही स्थगिती आली आहे.
पालकमंत्रिपद वाटपाच्या या वादामुळे पक्षातील असंतोष उफाळून आला असून, नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे.
1) कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांना 625 किमी लांब असलेला वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. 2) नाशिकच्या माणिकराव कोकाटेंना पालकमंत्री म्हणून 195 किमीवरचा नंदूरबार जिल्ह्याची जबाबदारी मिळाली आहे. 3) साता-याचे मकरंद पाटील यांना 440 किमी दूरच्या बुलढाणा जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळालं आहे. 4) नाशिकच्या नरहरी झिरवाळ यांना 445 किमीवरचा हिंगोली जिल्हा पालकमंत्री म्हणून देण्यात आला आहे. 5) लातूरच्या बाबासाहेब पाटील यांना 636 किमीवरील गोंदिया जिल्हा पालकमंत्री म्हणून सोपवण्यात आला आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.