काश्मीर मधील पहलगाम येथे देशासह महाराष्ट्र व इतर राज्यातील पर्यटकांनवर झालेला दहशवादी भ्याड हल्ल्यात मृत्यू पावलेल्या पर्यटकांच्या हृदय हेलावणऱ्या घटनेमुळे संबंधित देशभरात शोकाकुल वातावरणाची परस्थिती निमार्ण झाली असून, या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून निषेध व्यत होत असताना, बुधवार दि. २३ एप्रिल रोजी नेरळ शहर उद्धव बाळासाहेब शिवसेना शहर प्रमुख हेमंत उर्फ बंडू क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली नेरळ शहरातील छत्रपत्ती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपत्ती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ या दहशतवादी भ्याड हल्ल्यात मृत पावलेल्या पर्यटकांना प्रथम श्रद्धांजली वाहण्यात आली. त्या नंतर या भ्याड हल्ल्याचा त्रिव शब्दात जाहिर निषेध आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी या दहशतवाद्यांना पकडून कंठ स्नान घालण्याची सर्व उपस्थित शिवसैनिकांच्या माध्यमातून मागणी करण्यात आली. यावेळी नेरळ शहराचे अध्यक्ष हेमंत क्षीरसागर, संतोष सारंग, शशिकांत मोहिते, सुरेश गोमारे, सुधाकर देसाई, सुरेश भवारे, चिंधू बाबरे, राहुल भटकर, रमेश पवार, सतीश ठाकरे, भाऊ क्षीरसागर, अविनाश पवार, संजय कांबळे, अल्पेश मनवे, सुजाता मनवे, प्राची मनवे, रश्मीका शेलार, कल्पनाताई चव्हाण आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.