ऐतिहासिक वारसा लाभलेले, प्रदूषणमुक्त, निसर्गसंपन्न आणि शांततेने नटलेले माथेरान हे पर्यटनस्थळ मुंबई आणि पुण्याच्या अगदी जवळ असूनही आजही मूलभूत समस्या भोगत आहे. बाराही महिने पर्यटकांची वर्दळ असणाऱ्या या ठिकाणी योग्य सेवासुविधा, सुरक्षित वाहतूक व पर्यायी मार्गांची वानवा अजूनही जाणवत आहे.
माथेरानमध्ये येण्यासाठी नेरळ-माथेरान या एकमेव मार्गावरच अवलंबून राहावे लागते. सुट्ट्यांच्या हंगामात येथे येताना पर्यटकांना तासन्तास वाट बघावी लागते. कोणतीही पर्यायी सोय नसल्याने पर्यटकांचा वेळ व पैसा दोन्ही वाया जातो. त्यामुळे अनेक पर्यटक दुसऱ्यांदा येथे येण्याचा विचारही करत नाहीत. परिणामी, स्थानिक पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होत आहे.
अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक सेवासुविधा, पर्यायी मार्ग आणि योग्य प्रोत्साहन देण्याची मागणी करत आहेत. मात्र, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या काळात आश्वासनांचा पाऊस पडतो, आणि त्यानंतर माथेरानकडे कोणीही लक्ष देत नाही.
महाबळेश्वरसारख्या ठिकाणी महा पर्यटन महोत्सव साजरे होतात, मात्र माथेरानच्या नावाचा कुठेच उल्लेख नाही. माथेरानचा जागतिक नकाशावर असलेला ठसा राजकीय नेत्यांच्या लक्षात आहे की नाही, हाच प्रश्न निर्माण होतो. ‘महोत्सव नको, पण कमीतकमी येणाऱ्या पर्यटकांना सुविधा तरी द्या’ अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.