नेरळ शहरात जय श्रीराम रिक्षा चालक-मालक सेवाभावी संस्था या रिक्षा स्टॅन्ड चे उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराज चौक समोरील रेल्वे पार्किंग व्यवस्थेच्या ठिकाणी या प्रवाशी चालक रिक्षांना जागा देण्यात आली आहे. त्यामुळे नेरळकरांना आता सोयीचे आणि माफक २४ तास ही सेवा मिळणार असल्याचे रिक्षा चालकांकडून सांगण्यात आलं.
गेली अनेक वर्षे नेरळ शहरात राहून ही या रिक्षा चालकांना हक्काचे ठिकाण मिळत नव्हते मात्र आता काँग्रेसच्या पुढाकाराने आणि नेरळ ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मदतीने या रिक्षा चालकांना हक्काचे ठिकाण मिळाले आहे.
यासाठी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय शरद गवळी तसेच नेरळ शहर अध्यक्ष आनंद मोडक यांनी प्रयत्न केले होते. नुकताच या जय श्रीराम रिक्षा चालक-मालक सेवाभावी संस्था या रिक्षा स्टॅन्डला नाव देण्यात आले असून याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले आहे.
अनेक वर्षाच्या संघर्षानंतर खऱ्या अर्थाने रिक्षा उभी करण्यासाठी जागा मिळाल्याने रिक्षा चालकांनी काँग्रेस पक्षाचे आणि तेरा ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत.
या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय शरद गवळी, उप तालुका प्रमुख अरविंद कटारिया, नेरळ शहर अध्यक्ष आनंद मोडक, अस्लम शेख,नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तसेच नेरळ शहरातील प्रतिष्ठित नागरिक तर रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेरळ शहरात बाजार खरेदी साठी येणारे तसेच पर्यटक आणि मूळ निवासी यांना या प्रवाशी परीक्षेचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय नेरळ परिसरातील चिंच आळी, हेटकर आळी, टेप आळी, मोडक नगर, पायरमाळ – गणेश नगर, साई कृपा व्हॉल्ली – हजारे नगर, बुर्ऱ्हानी पार्क येथे राहणाऱ्या नागरिकांसाठी सोयीनुसार आपल्या सुरक्षित स्थळी माफक दरात पोहचता येणार आहे.यामधे शेअरिंग पद्धतीने देखील प्रवासी सेवा देण्यात येईल असे संघटनेकडून सांगण्यात आलं.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.