नेरळच्या पाली भूतीवली धरणात १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मुंबईतील चौघेजण फिरण्यासाठी आले होते

कर्जत पाटबंधारे विभागाचा अजब कारभार: शेतकऱ्यांना पाणी नाही, धनिकांसाठी सुविधा मात्र जोमात!
कर्जत (गणेश पवार) : 
कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील पाली भूतीवली धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या मुंबई घाटकोपर येथील तरुणांच्या सहलीचा आनंद दुर्दैवाने शोकांत झाला. बुधवार, ३० एप्रिल रोजी धरणात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे १८ वर्षीय मनीष छोटेलाल कानोजिया याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
दि. 30एप्रिल रोजी घाटकोपर येथून आलेले रिहान आसिफ अरब, रेहान शकील अहमद शेख, वाहिद मुबारक मकानदार आणि मनीष कानोजिया हे चौघे तरुण पाली भूतीवली धरण परिसरात सहलीसाठी आले होते. दुपारी ३ वाजता मॅगी बनवून खाल्ल्यानंतर सर्वजण पाण्याजवळ गेले असता, हात पाय धुण्याच्या प्रयत्नात मनीष खोल पाण्यात उतरला आणि अंदाज न आल्याने बुडून गेला.
घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. खोपोली येथील अपतग्रस्त संस्थेचे गुरुनाथ साठीलकर व त्यांच्या टीमने घटनास्थळी पोहोचून शोधमोहीम सुरू केली. त्यात मृत तरुणाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला व शवविच्छेदनासाठी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला.
ही घटना धरण परिसरातील सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करते. तरुणांचा उत्साह व आनंद असा एका क्षणात शोकांत होणं अत्यंत दुःखदायक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading