राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत मतदारसंघात अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी कडवी झुंज दिली. त्यामुळे निकालामध्ये चुरस निर्माण होऊन सर्वांच्या काळजाचे ठोके प्रत्येक क्षणाला चुकत होते. मात्र घारे यांची हि झुंज अपयशी ठरत काही मतांनी ते पराभूत झाले. त्यामुळे आता घारे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना सुधाकर घारे यांनी आज कर्जत येथे कार्यकर्त्यांना बोलावून नव संकल्प सभेचे आयोजन केले होते.
या सभेत सुधाकर घारे यांनी आपला पराभव मान्य करत नव्या संकल्पांचा हुंकार भरला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलेझाले. तर आगामी सर्व निवडणुकांमध्ये मी तुमच्यासोबत असून जे करायला लागेल ते करू पण तुम्हाला हा सुधाकर घारे एकटं सोडणार नाही असा शब्द दिला. यासह विरोधकांवर देखील घारे यांनी टीकेचे आसूड ओढत करेक्ट कार्यक्रम करणार असा थेट इशारा देखील दिला. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित झाले होते.
कर्जत रॉयल गार्डन येथे आज दिनांक २७ नोव्हेंबर रोजी सुधाकर घारे यांच्या परिवर्तन विकास आघाडीकडून नव संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर सुधाकर घारे यांच्यासह जेष्ठ नेते अशोक भोपतराव, भगवान भोईर, भरत भगत, उत्तम जाधव, भगवान चंचे, संतोष बैलमारे, राजेंद्र निगुडकर, महिला आघाडीच्या रंजना धुळे, सुरेखा खेडकर, युवा नेतृत्व अंकित साखरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी संतोष बैलमारे यांनी प्रास्तविक करताना खोपोली खालापूर भागात नागरिक मतदान करायला तयार होते मात्र आपण त्यांना मतदानापर्यंत घेऊन जायला कमी पडलो असे म्हणत चूक मान्य केली. मात्र यानंतर देखील आमचा नेता आमच्यासोबत खंबीरपणे उभा असल्याने आम्ही देखील पुढील वाटचालीसाठी तयार असल्याचे सांगितले. तर यावेळी बोलताना जेष्ठ नेते भरत भगत यांनी निवडणूक प्रशासन यांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बूथ क्रमांक २१७ चे मशीन खराब झाले होते तर व्हिव्हिपॅट मधील चिठ्या मोजण्याची गरज होती.
मात्र त्या १०१४ मते ग्राह्य धरलीच नाहीत त्यामुळे तेथील नागरिकांचा अधिकार मारला गेला असल्याचे सूचित केले. यासह विरोधकांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले. तर सुधाकर घारे यांनी बोलताना कर्जतचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांच्यावर निशाणा साधला राजेश लाड यांच्या म्हणण्यानुसार आमच्या दोन भावांमध्ये वाद आहेत. मात्र २०१४ च्या निवडणुकीत तुम्हाला निवडून येण्याची शास्वती नव्हती तेव्हा याच सुधाकर घारेला आपण घरातून घेऊन गेलात आणि नेतृत्व करायला सांगितलं. याच सुधाकरने वासरे खोंडयात तुम्हाला लीड निवडणूक आलात. आमच्या भावांमध्ये वाद आहेत असं तुमचं म्हणणं असेल तर शरद लाड यांना नगरपरिषद निवडणुकीत कुणी पाडलं ? असा सवाल घारे यांनी उपस्थित केला.
कार्यकर्त्यांना त्यांनी पुढील निवडणुकीसाठी आपण त्यांच्या सोबत असल्याचा विश्वास दिला. यासह आता रडायचं नाही लढायचं म्हणत घारे यांनी नवसंकल्प सभेतून पुढील तयारीला लागण्याचे संकेत दिले. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित झाले होते.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.