धक्कादायक !अवघ्या पाच वर्षांच्या दोन चिमुकलींवर बसमध्ये क्लीनर कडून अत्याचार; पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

Karjat School Bus Rape
अलिबाग (अमुलकुमार जैन) : 
कर्जत तालुक्यात बदलापूर सारखी घटना समोर आली असून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर स्कूल बसमधल्या क्लिनर असलेल्या तरुणाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही मुली अवघ्या पाच वर्षांच्या आहेत. या घटनेची नोंद कर्जत पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेबाबत पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, शाळा व शाळेची बस खरंच सुरक्षित आहे का? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक करीत त्याच्यावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. करण दीपक पाटील (24) असे आरोपीचे नाव असून तो कर्जत तालुक्यातील वदप येथील राहणारा आहे.
त्या पिडीत मुलींनी करणने केलेल्या कृत्याबद्दल आपल्या घरी पालकांना ही माहिती दिली आणि नंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.आरोपी करण हा त्यांना बसमधल्या ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर येऊन बसायला सांगायचा आणि  अश्लीलरीत्या स्पर्श करायचा. तसेच त्या सीटवर बसायला गेल्या नाही तर तो त्यांना मारहाण सुद्धा करायचा. हा सर्व प्रकार गेल्या वर्षभरा पासून पीडित मुलींसोबत होत असल्याचे त्यांच्या पालकांनी सांगितले आहे. आपल्या मुलींची लैंगिक छेड काढली जात असल्याने पालकांनी थेट कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी पीडितांच्या पालकांवर दबाव टाकल्याचा आरोप मुलीच्या आईनं केला आहे. त्यामुळे संताप अधिक वाढला आहे.
दरम्यान, स्कूल बस मालकाचीसुद्धा चौकशी व्हावी, अशी मागणी पालक करत आहेत. तसेच या प्रकरणातील आरोपी करण पाटील यांच्यासह ज्यांचा-ज्यांचा या प्रकरणाशी संबध असेल त्यांनाही कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडितांच्या नातेवाईकांनी केली आहे. यापूर्वी बदलापूरमध्येही असाच प्रकार घडला होता. आता कर्जतमध्येही ही विकृती समोर आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अशा नराधमांना कठोर शिक्षा द्या, अशी मागणी आता पालक वर्गात जोर धरू लागली आहे.
यापूर्वी बदलापूरमध्ये असाच प्रकार नुकताच घडला होता, आणि आता कर्जतमध्येही ही विकृती समोर आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र “अशा नराधमांना कठोर शिक्षा द्या!”, अशी मागणी आता पालक वर्गातून जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading