तीन दिवसांपूर्वी जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात काही निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या अमानुष घटनेचा निषेध करण्यासाठी आणि मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पनवेलमध्ये दाऊदी बोहरा समाजाच्या अंजुमन ए नजमी जमात कमिटीने भावपूर्ण श्रद्धांजली सभा आयोजित केली.
या प्रसंगी समाजाचे अनेक बांधव एकत्र आले होते. त्यांनी हातात निषेधाचे फलक धरून आणि शांततेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. समाज बांधवांनी मौन पाळून हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली.
दहशतवाद्यांनी केलेल्या या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त करत, अशा घटनांना विरोध करण्यासाठी संपूर्ण समाज एकवटल्याचे या कार्यक्रमातून दिसून आले. शांतता, सहिष्णुता आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देत बोहरा समाजाने एक समाजिक बांधिलकी जपल्याचे या प्रसंगी पाहायला मिळाले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.