ताम्हिणी घाटात भीषण अपघात: पाच जण जागीच ठार, तीसहून अधिक जखमी

ताम्हिणी घाटात भीषण अपघात: पाच जण जागीच ठार, तीसहून अधिक जखमी

रायगड ( अमुलकुमार जैन ) :
रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात आज, शुक्रवार, २० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी साडे नऊ ते दहाच्या दरम्यान ताम्हिणी घाटात लग्नासाठी जात असलेल्या खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले असून तीसहून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
प्राप्त महितीनुसार, ही घटना पुणे, पिंपरी-चिंचवड येथून वीरवाडी (महाड) येथे लग्नासाठी जात असलेल्या बसला ताम्हिणी घाटातील वॉटरफॉल पॉईंटजवळ घडली. बस तीव्र उतारावर नियंत्रण सुटल्याने दरीत कोसळली. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. मृतांची नावे संगिता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदीप पवार, वंदना जाधव अशी ओळख पटली असून, एका पुरुषाची ओळख अजूनही पटलेली नाही.
बसमधील ४५ प्रवाशांपैकी ३० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच माणगांव पोलिस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले. अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. जखमींना माणगांव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ताम्हिणी घाटातील हा अपघात अत्यंत भीषण स्वरूपाचा असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य अद्याप सुरू आहे, आणि पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading