ठोस निर्णय होईपर्यंत उच्च दाब विद्युत वाहिनीचे काम थांबवा – शेतकऱ्यांचा इशारा

ठोस निर्णय होईपर्यंत उच्च दाब विद्युत वाहिनीचे काम थांबवा – शेतकऱ्यांचा इशारा
पेण :
पेण, पाली विभागातील गावांमध्ये उच्च दाब विद्युत वाहिनीचे टॉवर उभारण्याचे काम सुरू असून यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. या संदर्भात प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, शिवसेना शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे, महापारेषण व जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी तसेच बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत युवा नेते वैकुंठ पाटील व संजय म्हात्रे यांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सुरू असलेले उच्च विद्युत वाहिनीचे काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली. जमिनीचे नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
शेतकऱ्यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले की, जोपर्यंत त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्या जमिनीत महापारेषणला कोणतेही काम करू दिले जाणार नाही. या प्रश्नावर ठोस निर्णय होईपर्यंत उच्च दाब विद्युत वाहिनीचे काम थांबवावे, असा ठाम इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading