शिवमंदिरात अभिषेक पूजा करायची आहे म्हणून घरून शहाळे (नारळ) आणण्यासाठी गेलेले रायगड जिल्ह्यातील राजपुरी येथील जयेश पांडुरंग गीते (वय 48वर्षे, तालुका – मुरुड जंजिरा) हे परत आले नाही. मात्र त्यांच्या मृत्यूची वार्ता गावात पोहचली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रायगड जिल्ह्यातील मुरुड शहरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या राजपुरी येथील जयेश पांडुरंग गीते (वय 48वर्षे, तालुका – मुरुड जंजिरा) हे सोमवार दिनांक सहा जानेवारी रोजी सोमवार असल्याने राजपुरी येथील शिवमंदिरात पहाटे अभिषेक पूजा असल्याने त्याची तयारी करीत असताना शहाल्याची(नारळ) आवश्यकता आहे. म्हणून जयेश गीते है शहाळे खरेदी करून आणण्यासाठी गावापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुरुड शहरातील समुद्रकिनारी रविवारी सायंकाळी आले होते.
जयेश गीते हे मुरुड समुद्रकिनारी श्रीयश रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या चंदन खोत यांच्या शहाळे स्टॉलवरून शहाळे खरेदी करून राजपूरी येथील निवासस्थानी परतत असताना समुद्रकिनारी असलेल्या सुमारे 90 फूट उंच नारळाच्या झाडावरून वेगाने नारळ डोक्यात पडल्याने जयेश तिथल्या तिथेच जागीच गतप्राण झाला. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण मुरुड तालुक्यासह राजपुरी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मयत जयेश गिते हे राजपुरी कोळीवाडा येथील नौका हरिहरेश्वर या बोटीचे तांडेल आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी व दोन मुलगे असा परिवार आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.