ग्रा.पं. च्या डम्पिंग ग्राउंडमुळे नेरळ उल्हासनदीचे अस्तित्व घाणीच्या विळख्यात

Neral Dumping

कर्जत ( गणेश पवार ) : 

नेरळ विकास संकुलन प्राधिकरणात क्षेत्रात येणाऱ्या नेरळ, ममदापूर व कोल्हारे ग्रामपंचायतीचे डम्पिंग ग्राऊंड हे नेरळ उल्हासनदी पात्रा लगत असल्याने अस्तित्व घाणीच्या तर उल्हासनदीला जोडणाऱ्या नैसर्गिक नाल्यान मध्ये मोठ्या प्रमाणात सोडले जाणाऱ्या सांडपाण्यामुळे मात्र उल्हासनदीचे अस्तित्व दुषित विळख्यात असल्याचे विधारक सत्य समोर येत आहे. तर याच उल्हासनदीवर नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या योजना कार्यान्वित असल्याने भविषात उल्हासनदीचे धोक्यात येणाऱ्या पावित्र्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा प्रश्न मात्र समोर येत आहे.
नेरळ विकास संकुलन प्राधिकरण स्थापन झाल्यापासुन व नेरळ विकास संकुलन प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या नेरळ, कोल्हारे तसेच ममदापूर ग्रामपंचायतींच्या हद्दीत मोठ मोठे गृहप्रकल्प उभारले जात होत आहे. यामुळे या तिन्ही ग्रामपंचायत मध्ये वाढते नागरिकीकरण पाहाता मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत असुन, या कचऱ्याची विलेवाट लावण्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रामुख्याने या ग्रामपंचायतींची असल्याप्रमाणे ममदापूर ग्रामपंचायती अस्तित्वात असलेले डम्पिंग ग्राऊंड हे उल्हासनदी पात्रा लगत आहे.
कोल्हारे ग्रामपंचायतीचे डम्पिंग ग्राऊंड हे देखिल उल्हासनदी पात्रा लगत आहे. तर नेरळ विकास संकुलन प्राधिकरणा कडून दीड कोटी च्या निधीतून उभारण्यात आलेला नेरळ ग्रामपंचायतीचा शुन्य घनकचरा प्रकल्पाचा कचरा हा उल्हासनदी पात्राला जोडणाऱ्या नैसर्गिक नाल्या लगत असलेला डम्पिंग ग्राऊंड असल्याने व या तिन्ही ग्रामपंचायती कडून त्यांच्या हद्दीतील मोठया प्रमाणात निर्माण होणारा कचरा हा या डम्पिंग ग्राऊंड मध्ये टाकला जात असल्याने मात्र उल्हासनदीचे अस्तित्व घाणीच्या विळख्यात तसेच या तिनी ही ग्रामपंचायती क्षेत्रातील वाढते गृहप्रकल्पांचे सांडपाणी हे उल्हासनदी पात्राला जोडणाऱ्या नैसर्गिक नाल्यानमध्ये मोठया प्रमाणात सोडले जात असल्याने उल्हासनदीचे पाणी हे मोठया प्रमाणात दुषित होत असल्याचे विधारक सत्य समोर येत आहे.
 याच उल्हासनदीवर आनेक ग्रामपंचायतीच्या पाणी योजना कार्यान्वित असल्याने तर काही ग्रामपंचायतीच्या पाणी योजनांवरती फिल्टरेशन प्लान नसल्याने व थेट पाणी पुरवठा होत असल्याने भविषात अशा ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे वस्तू स्थिती पाहाता. मात्र
उल्हासनदीचे अस्तित्व घाणीच्या व दुषित होण्याच्या विळख्यात असल्याचे विधारक सत्य मात्र समोर येत असल्याने, उल्हासनदीचे धोक्यात येणाऱ्या पावित्र्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा प्रश्न समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading