विद्येचे प्रतीक असलेल्या गणरायाचे देशात व राज्यभरात मोठ्या जल्लोषात अगमन झाले आसुन, मोठया भक्तीमय वातावरणात भक्तांकडून गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून पूजाआर्चा केली जाते. तर काही गणेशभक्त हे आपल्या घरात दीड दिवसाच्या गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मोठया भक्तीभावने विधीपूर्वक पूजाआर्चा करतात, दि. ८ सप्टेंबर २०२४ रोजी कर्जत – नेरळ मधिल दीड दिवसांच्या बाप्पांना गणेशभक्तांनी मोठया जलोषात ढोल ताशाच्या गजरात निरोप देत आपल्या लाडक्या बाप्पांचे विसर्जन केले.
विसर्जन मिरवणीकीमध्ये कोणताही आनुचित प्रकार घडू नये व वाहतूक नियंत्रण तसेच कायदासुव्यवस्था राखण्यासाठी कर्जत – नेरळ पोलीसांकडून चोक असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नेरळ ग्रामपंचायतीने विर्सजन दरम्यान कोणती दुर्घटना घडून जिवितहानी होऊ नये म्हणून गणेश भक्तांची काळजी घेत दरवर्षी प्रमाणे ग्रामपंचायतीचे कर्मचारी तैनात करून, बाष्पाच्या विसर्जनासाठी बोटीची व्यवस्था करण्यात आली होती.
या वेळी गणेश घाटावर विसर्जनासाठी आलेल्या गणेशमूर्ती वर नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच उषाताई पारधी, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, माजी सरपंच तथा माजी जिल्हा परिषद पक्ष प्रतोड सावळाराम जाधव, ग्रामसेवक व सदस्य प्रथमेश मोरे यांच्यासह नेरळ मधील राजकीय व प्रतिष्ठीत मान्यवर यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली.
नेरळमध्ये सार्वजनिक एक व घरगुती ६९५ तर कर्जत पोलीस ठाणे हद्दीत घरगुती १२३७ गणपती बाप्पांचे विसर्जन झाल्याची माहिती पोलीस सुत्रा कडून देण्यात आली आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.