गडब काशीनगर येथे घरासमोरील छोट्या नाल्यातून विजेची वाहिनी टाकल्याने त्यात पावसाळ्यात पाणी साचल्याने येणाऱ्या व जाणाऱ्या पाण्याला विजेचा करंट लागत आहे. ह्या नाल्यासमोर कमलाकर पाटील, काशिनाथ पाटील आदी कुटुंबे राहत असुन यांना सातत्याने या पाण्यातून ये जा करावे लागते. अशा स्थितीत मनुष्यहानी होण्याचा धोका असल्याने वीज मंडळाला वर्षभरात सातत्याने पत्रव्यवहार केला तरीही ही विजवाहिनी बदलत नसल्याने कुटुंबीयांनी आता उपोषणाचा इशारा दिला आहे.
येथील कुटुंबीयांनी वडखळ व पेण येथील विजमंडलाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन वस्तुस्थिती समजून सांगितली आहे. मात्र अधिकारी तेवढ्या पुरते लाईन बदलतो अशी उत्तरे देत आहेत.
आता पुढील आठवड्यात पावसाला सुरुवात झाल्यावर या जीवघेण्या नाल्याचे पानी घरासमोर आणि घरासमोर चे पानी या नाल्यात जाणार असुन या पाण्याला वीजेचा करंट लागत असल्याने कसे जायचे असा प्रश्न पडल्याने प्रशांत पाटील व कमलाकर पाटील कुटुंबीयांनी आठवड्यात प्रश्न न सुटल्यास आमरण उपोषणाचा इशारा वीज मंडळाला दिला आहे.
—————————————–
‘ ह्या नाल्यासमोरून दररोज 3 कुटुंबाचे जाणे येणे असते. घरात लहान मुले, वयस्कर माणसे आहेत. पावसाळ्यापूर्वी वीज वाहिनी बदलून न घेतल्यास मनुष्य हानी होण्याची दाट शकता आहे. होणाऱ्या मनुष्य हानिस नुकसानीस वडखळ महावितरण जबाबदार राहील .’
…के.पी.पाटील आणि प्रशांत पाटील, गडब
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.