विधानसभेत शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी शिट्टीच्या निशाणी समोरील बटन दाबून अतुल म्हात्रे यांना भरघोस मतांनी निवडून द्या. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता शेतकरी व भूमिपुत्रांचा प्रतिनिधी म्हणून अतुल म्हात्रे यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे यांनी वडखळ येथे अतुल म्हात्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी केले. या प्रचार रॅलीत शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.
गडब, काराव, डोलवी परिसरात शासनाने एमआयडीसीचे नियोजन करताना येथील स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही तसेच धनदांडग्या उद्योगपतींसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अत्यल्प दराने अधिग्रहण करण्याचा सरकारने घातलेला घाट आम्ही हाणून पाडू. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस व ज्येष्ठ नेते भाई जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मागील अनेक महिन्यांपासून हा प्रकल्प रोखून धरला आहे. शासनाच्या कायद्याप्रमाणे जमिनीचा चौपट दर मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे प्रकल्पामध्ये स्थानिक शेतकऱ्यांना भागीदार म्हणून सहभागी करून घ्यावे असा माझा दृष्टिकोन आहे. ज्यायोगे शेतकरी प्रस्थापित होईल. रोजगार, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन अतुल म्हात्रे यांनी यावेळी केले.
रायगड जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती संजय जांभळे यांचे मार्गदर्शनाखाली वडखळ, नवेगाव,डोलवी परिसरात शेकाप उमेदवार अतुल म्हात्रे यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलीला उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. या प्रचार रॅलीचा शुभारंभ वडखळ येथील गणेश मंदीरात श्रीफळ वाढवुन करण्यात आला.
या वेळी पेण विधानसभा मतदार संघाचे शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे माजी बांधकाम सभापती संजय जांभळे, काॅगेस तालुकाअध्यक्ष अशोक मोकल वडखळ ग्रामपंचायत सदस्य निळेश म्हात्रे लक्ष्मण गांवड आदि असंख्य महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.