खांब पंचक्रोशीच्या अखंड हरीनाम सप्ताहास प्रारंभ, श्रीमद् भागवत कथेसह महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा

Harinam Saptah
कोलाड (श्याम लोखंडे) :
रोहा तालुक्यातील नामवंत अशा श्रीसंत सेवा मंडळ खांब पंचक्रोशीचा ६८ वे अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र तळवली (कुंभाराची) तर्फे अष्टमी येथे या हरीनाम सप्ताहास प्रारंभ झाला असून सदरच्या सप्ताहात २० ते २७ मार्च या कालावधीत अनेक साधू संत यांच्या प्रबोधन कीर्तनरूपी सेवेच्या माध्यमातून तसेच पंचक्रोशीत नाविन्यपूर्ण एक आध्यात्मिक विचारांचा सोहळा म्हणून श्रीमद् भागवत कथा महंत वेदांतचार्य स्वामी हभप विवेकानंद शास्त्री महाराज सिद्धेश्वर संस्थान बीड यांच्या अनमोल वाणीतून विवेचन संपन्न होत असून याचा सर्व संप्रदाय भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मौजे तळवली ग्रामस्थ आणि खांब पंचक्रोशी यांच्याकडून करण्यात आले आहे.
कोकण वाशीयांचे श्रद्धास्थान परमपूज्य स्वानंद सुखनिवासी सद्गुरू वै. हभप अलिबागकर महाराज,गुरुवर्य गोपाल महाराज वाजे,धोंडूबाबा कोल्हटकर यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या तसेच परमपूज्य पांडुरंग शात्री आठवले (दादा) आणि सद्गुरू मामासाहेब दांडेकर गुरुवर्य बाबामहाराज सातारकर यांचे थोर प्रबोधन लाभलेल्या खांब पंचक्रोशीत हभप नारायण दादा (अलिबागकर ) वाजे, हभप दत्तू महाराज कोल्हटकर (पंढरपूर) यांचे कुशल मार्गदर्शन तसेच हभप रायगड भूषण खांब पंचक्रोशीचे वैभव डॉ.मारुती महाराज कोल्हटकर यांच्या नेतृत्वाने हा अखंड हरिनाम व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण तसेच श्रीमद् भागवत कथा श्री क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी या ठिकाणी मोठ्या उत्साह वातावरणात संपन्न होत असून भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होत असलेल्या सप्ताहासाठी तळवली ग्रामस्थ,युवक मंडळ महिला वर्ग तसेच मुंबईकर मंडळी अथक परिश्रम घेत आहेत.
रोहा तालुक्यातील मौजे तळवली येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात भव्य दिव्य स्वरूपात या अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून येथील मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे तर सारे गाव कणा रांगोळी फुलांनी सजवून गेलेले आहे.तर सदरच्या धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमानिमित्ताने येथील युवक युवती यांच्या कडून विविध कलाकृती सजावट करण्यात आली असून दररोज सकाळी काकडा आरती,श्री संत ज्ञानेश्वर गाथेवरील पारायण,श्री संत तुकाराम महाराज गाथेवरील भजन दुपारी २:३० ते सायं ५:३० वाजता श्रीमद् भागवत कथा महंत हभप विवेकानंद शास्त्री यांच्या वाणीतून भाविकांना श्रवण होत आहे तसेच हभप नारायण महाराज अलिबागकर वाजे,हभप मदन महाराज कोल्हटकर, हभप रामदास महाराज टांगले,हभप रामदास महाराज पाटील,हभप तुकाराम महाराज शिंदे,हभप विनायक महाराज कांबेकर,हभप न्यायाचार्य महंत नामदेव महाराज शास्त्री ,महंत विवेकानंद शास्त्री,तर सांगता समारोह काल्याची कीर्तन सेवा हभप मारुती महाराज कोल्हटकर यांची संपन्न होणार आहे.
तर सदरच्या या कार्यक्रमात तसेच भक्तीमय वातावरणात संपन्न होत असलेल्या या अखंड हरीनाम सप्ताहात गायनाचार्य हभप रविंद्र महाराज मरवडे,विकास महाराज कोतेकर, विनोद महाराज कोतेकर,नितीन महाराज कचरे,यांच्या सुमधुर आवाजात उपस्थित भाविक मंत्र मुग्ध होत आहेत तसेच मृदुंगमणी यांची देखील उत्तम प्रकारे साथ लाभल्याने या धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमाला अधिक रंग चढला असून दररोज अलोट भाविकांची गर्दी असलेली पहावयास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading