रायगड जिल्ह्यातील कोलाड पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे अखेर पुई-पुगाव या आदिवासी वाडीकडे जाणारा मुख्य साकव पूल उजवातीर कालव्यावर अचानक कोसळल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे रहिवासी, विद्यार्थी, महिला, गरोदर माता, तसेच दैनंदिन मजुरीवर अवलंबून असलेल्या आदिवासी नागरिकांचा मुख्य मार्ग बंद झाला आहे.
दुपारच्या सुमारास पूल कोसळताच त्यावरून बकऱ्या घेऊन जाणारे आदिवासी बांधव अचानक संकटात सापडले. बकऱ्या पाण्यात वाहून जात असताना नागरिकांनी जीव धोक्यात घालून त्यांना वाचवले. मात्र ही घटना घडल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेची माहिती मिळताच संबंधित पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, पूल कोसळल्यानंतर आदिवासी वाड्याचा संपर्क तुटल्यामुळे शाळकरी मुले शाळेत, गरोदर स्त्रिया दवाखान्यात, तसेच बाजार व इतर ठिकाणी पोहोचणे अशक्य झाले आहे. पूल जीर्णावस्थेत असून देखील वर्षानुवर्षे दुरुस्ती न झाल्यामुळे अखेर त्याचे परिणाम थेट सामान्य नागरिकांवर झाले आहेत.
यावेळी पुई ग्रामपंचायत मा. सरपंच संजय मांडळुस्कर,सुनील दळवी,पुगांव ग्रामपंचायत मा. सदस्य सुधीर शेळके, तसेच वाडीवरील वसंत कोळी, राम वाघमारे, अनिल वाघमारे, संतोष वाघमारे, विजय जाधव, रामू कोळी, परशुराम जाधव, सिताराम जाधव, ज्ञानेश्वर कोळी,सुनील जाधव, राजेश जाधव, चंद्रकांत जाधव, संतोष जाधव, अनिल वाळेकर, रमेश जाधव, आण्णा पवार, राम कोळी, चंद्रकांत वाघमारे, गणेश वाघमारे पुगाव व पुई गावातील ग्रामस्थ पुगांव पुई आदिवासी ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
येथील आदिवासी नागरिक दररोज मोल मजुरी करतात हातावर कमावणार मग पोटभर खाणार तर काहीजण शेळी पालन करतात त्यावर आपले कुटुंब चालवतात, मात्र आजच्या घडीला त्यांच्यावर कलवा मार्गावरील फुल कोसळल्याची घटना घडल्याने मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे या ठिकाणी संबंधित अधिकारी वर्गाने लक्ष केंद्रित करत लवकरात लवकर उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.