सहा जून रोजी किल्ले रायगडावर साजरा झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्यावेळी अतिउत्साही शिवभक्तांमुळे रायगडावर नेमण्यात आलेले प्रशासन देखील हतबल झाले असल्याचे चित्र शिवराज्याभिषेक सोहळ्या दरम्यान जागोजागी पाहण्यास मिळत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात व जल्लोषात साजरा होत असताना राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या काही आताताई शिवभक्तांमुळे रायगडावर शिवभक्तांच्या सोयीसाठी व देखरेखीसाठी नेमण्यात आलेल्या प्रशासनाने देखील हात टेकल्याचे चित्र आज जागोजागी रायगडावर पाहण्यास मिळाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती मात्र काही ठिकाणी अतिउत्साही शिवभक्त किल्ले रायगडावर असणाऱ्या या ऐतिहासिक ठेवायचं जतन व संवर्धन करण्यासाठी राज्य शासन पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करीत असताना मात्र अतिउत्साहाच्या भरात किल्ले रायगडावरील ऐतिहासिक ठेव्यांवरती (वास्तूंवर व तटबंधींवर) उभे राहून त्या तटबंदी खिळखिळ्या करण्याचे काम व त्याला धोका उत्पन्न होईल अशा पद्धतीने त्याचा वापर चालू असल्याचे चित्र रायगडावर जागोजागी पाहण्यास मिळत होते.
एसटीच्या टपावरून प्रवास
किल्ले रायगड जाण्यासाठी व किल्ले रायगडावरून पुन्हा परतण्यासाठी महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने तब्बल 100 बसेसची व्यवस्था केली असताना देखील काही अतिउत्साही शिवभक्त हे एसटी महामंडळाच्या टपावरून प्रवास करीत होते. याबाबत पोलिसांनी अनेकांना उतरवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांना नजुमानता अनेकांनी एसटीच्या टपावरून प्रवास केल्याचे चित्र प्रत्यक्ष पाहण्यास मिळाले.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.