काँग्रेसची मागणी : वादग्रस्त अधिकारी हटवा, रश्मी शुक्ला यांची कारकिर्द संशयास्पद

Nana Patole

मुंबई :

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पडण्यासाठी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे वादग्रस्त अधिकाऱ्यांना हटवण्याची मागणी केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले की, राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची कारकिर्द वादग्रस्त असून, त्यांच्यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग आणि धमकावणे यांसारखे आरोप आहेत.
निवडणुका पारदर्शक व्हाव्यात यासाठी, रश्मी शुक्ला यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना निवडणूक काळात हटवण्याची गरज असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. पटोले यांनी आरोप केला की, शुक्ला यांना सेवा समाप्ती नंतरही मुदतवाढ देऊन भाजपा सरकारला मदत केली जात आहे.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन, त्यांच्या मागण्यांची पत्रे सादर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading