कर्जत नगरपरिषदेच्या समस्या; नागरिकांत असंतोष, जनआंदोलनाची तयारी

Karjat Shahar Bachav Samiti

कर्जत ( गणेश पवार ) : 

कर्जत नगरपरिषदेकडून अनेक समस्यांवर होणारे अक्षम्य दुर्लक्ष आणि प्रशासकाच्या कार्यकाळात या समस्यांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन गंभीर नसल्यामुळे कर्जत शहर बचाव समितीने जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
दि. २२ सप्टेंबर रोजी ॲड. कैलास मोरे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत शहर बचाव समितीची बैठक आयोजित केली होती. नागरिकांनी मोठ्या संख्येने या बैठकीत सहभाग घेतला आणि विविध समस्यांची मांडणी केली. कचरा व्यवस्थापन, पार्किंगच्या समस्या, ट्रॅफिक आणि अस्वच्छता या मुख्य तक्रारी आहेत. याशिवाय प्रशासकाच्या कारभारावर तीव्र टीका झाली.
आता बुधवार, दि. २५ रोजी समस्या सोडविण्यासाठी नगरपरिषदेकडे निवेदन देण्यात येणार असून, सकारात्मक प्रयत्न न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, असे ॲड. मोरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading