कर्जत तालुका बहुल आदिवासी भूभाग आहे. आशा बहुल आदिवासी भूभागावर वसले वाड्या वस्त्यावर शासनाअंतर्गत पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र त्या योजनेची काही कामे चालू आहेत तर काही ठिकाणी तर नावाला पाणी योजना राबविल्या असल्याचे चित्र आहे.
या राबविण्यात येणाऱ्या पाणी योजने पैकी काही योजना बंद स्थितीत तर नवीन पाणी पुरवठा योजनेची कामे ही अपूर्ण स्थितीत आहेत.अशा या राबविण्यात आलेल्या पाणी योजनांमुळे आदिवासी वाडी वस्तीवर सुरळीत पाणी पुरवठा होत आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत असल्याने, व अशा पाणी पुरवठा योजनेसाठी शासनाचा करोडो रुपयांचा निधी खर्च करून जर पाणी मिळत नसेल तर आदिवासी समाजाचे दुदैव समजावे का? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
अशा असंख्य वाडया वस्तीवरील सुरू असलेली पाणी टंचाई पाहाता मात्र आदिवासी वाड्यावस्ती वरील पाणी टंचाई कधी मिटेल का? असा प्रश्न आदिवासी समाज संघटने कडून उपस्थित करत,कळंब, कशेळे,मोग्रज, अंबिवली,जाबरूख,खांडस,पाथरज,रेल्वे पट्टा,नेरळ, कर्जत अशा विभागात पाणी योजनेची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावी, व बंद स्थितीत असलेल्या योजना सुरळीत कराव्यात तसेच पाणी टंचाई भागात तातडीने टॅकर ने पाणी पुरवठा सुरु करावा व आदिवासी वाडी वस्तीवर असलेली पाणी टंचाई दूर करावी. जर वाड्या वस्तीवरीत अपूर्ण पाणी पुरवठा योजना पूर्ण न केल्यास तसेच बंद योजना तातडीने सुरळीत न केल्यास आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल तसेच आपल्या कार्यालयावर हंडा मोर्चा चे आयोजन केले जाईल असा इशारा हा निवेदनाद्वारे उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा रा. जि.प. उपविभाग कर्जत व गटविकास अधिकारी पं.स. कर्जत यांना आदिवासी समाज संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरवडा, महिला अध्यक्षा तथा माजी उपसभापती पं.स.कर्जत जयवंती दत्तात्रेय हिंदोळा, उपाध्यक्ष मंगळ केवारी सचिव भगवान भगत माजी अध्यक्ष जैतू पारधी, राजू झुगरे, मनोहर ढुमणे, गणेश पारधी, बबन शेंडे, वाळकू चौधरी व आदी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.