कर्जत आणि खालापूर तालुक्यांचा समावेश कल्याण जिल्ह्यात करण्याचं आव्हान

Raigad Map
कर्जत (गणेश पवार) :
 आगामी काळात रायगड आणि ठाणे जिल्ह्यांचे विभाजन होऊन महाड व कल्याण हे नवे जिल्हे निर्माण होणार आहेत. कर्जत आणि खालापूर तालुक्यांचा समावेश कल्याण जिल्ह्यात करावा अशी मागणी केली जात आहे.
कर्जत तालुक्याचे अलिबाग येथील जिल्हा मुख्यालय अत्यंत दूर असल्याने नागरिकांना शासकीय कामासाठी तारेवरची कसरत करावी लागते. कर्जतचे ठाणे जिल्ह्याशी रेल्वेने चांगले जॉईन होत असल्यामुळे या तालुक्यांना कल्याण जिल्ह्यात समाविष्ट करणे सोयीस्कर ठरेल. सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी यासाठी सर्व राजकीय नेत्यांना, सामाजिक संस्थांना आणि पत्रकारांना एकत्र येऊन लढा देण्याचे आव्हान केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading