बदलापूर अंबरनाथ लोकलच्या संख्येत वाढ होत नसल्याने, दिवसेंदिवस कर्जत लोकल मधील वाढणारी प्रवाशांची संख्या व त्यामुळे होणारी गर्दीमुळे लोकल ट्रेन मधून पडून आपघात होणाऱ्या समक्षांचा प्रश्न गंभीर बनला आहे. आशा होणाऱ्या गर्दीमुळे कर्जत मधील २५ वर्षीय ऋतुजा जंगम या तरूणीचा कर्जत कडे येणाऱ्या अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान लोकल ट्रेन मधून पडून दुर्दैवी मृत्यूची घटना घडली आहे.
दि. २२ ऑक्टोंबर २०२४ रोजी ठाणे रेल्वेस्थानकामधून कर्जत कडे घरी परतण्यासाठी कर्जत महाडा कॉलनी मध्ये राहणारी २५ वर्षीय ऋतुजा जंगम ही तरूणी कर्जत लोकल पकडून या लोकल मध्ये गर्दी असल्याने दरवाज्यामध्ये उभी राहून प्रवास करीत होती. या प्रवासा दरम्यान कर्जत लोकल ही अंबरनाथ रेल्वेस्थानक येताच ऋतुजा जंगम ही स्थानकात उतरून प्रवासी उतरल्या नंतर पुन्हा लोकल मध्ये चढून लोकल ट्रेनच्या दरवाज्यातील लोखंडी खांबाला पकडून उभी होती.
लोकल ही बदलापूर रेल्वे स्थानकाकडे निघाली असता, बदलापूर रेल्वे स्थानकात उतरण्याऱ्या प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ऋतुजा जंगम ही तरूणी लोकल ट्रेन मधून पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. उपचाराकरीता ऋतुजा जंगम या तरूणील उल्हासनगर मधील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान ऋतुजा जंगम या तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
ऋतुजा जंगम या तरूणीचा दुर्दैवी मृत्यू हा लोकल ट्रेन मधील क्षमतेपेक्षा वाढत्या गर्दीमुळे रेल्वे प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे एक जिवंत उदाहरण आहे. अंबरनाथ बदलापूर तसेच कर्जत लोकल मध्ये वाढ व वाढती गर्दी पाहाता व असे घडणारे आपघात रोखण्याप्रती लोकल ट्रेनची क्षमता वाढवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी १५ डब्यांच्या लोकाल ट्रेन सुरू करण्याच्या रेल्वे प्रवाशी व प्रवाशी संघटनेंकडून रेल्वे प्रशासनाकडे वारंवार मागण्या केले आहे.
मात्र हे नियोजन कागदावर येत असुन, प्रत्यक्षात असलेले शुन्य नियोजन तर अंबरनाथ बदलापूर येथील वाढते नागरिकरणामुळे रेल्वे प्रवासी यांची वाढती संख्या व त्यामुळे होणारी गर्दी पाहाता बदलापूर अंबरनाथ लोकल ट्रेनच्या संख्येत वाढ होत नसल्याने, बदलापूर अंबरनाथ येथील रेल्वे प्रवासी हे कर्जत लोकल ट्रेन मधून मोठया प्रमाणात प्रवास करीत असल्याने गर्दीचे प्रमाण वाढत असल्याने कर्जत वांगणी , नेरळ, भिवपूरी, कर्जत, खोपोली येथील रेल्वे प्रवाशांना गर्दीचा मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे तर या वाढत्या गर्दीच्या कारणामुळेच कर्जतच्या २५ वर्षीय ऋतुजा जंगम हिचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे ही रेल्वे प्रवाशांकडून बोलले जात आहे.
आशा घटना रोखण्यासाठी योग्य ते नियोजन करण्यासाठी रेल्वे प्रवासींकडून रेल्वे पॅसेंजर असोसिएशन व संबंधित रेल्वे अधिकारी यांच्या कडे अर्ज करण्याचे अहवान रेल्वे प्रवासींकडून केले जात आहे. तर २५ वर्षीय ऋतुजा जंगम हिच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे कर्जतकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.