समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित करण्यात आले आहे. औरंगजेब संदर्भातील वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई झाली.
राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात निलंबनाचा प्रस्ताव मांडला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझमींवर तीव्र शब्दांत टीका केली. त्यानंतर सभागृहात गोंधळ निर्माण झाला, आणि अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आवाजी मतदान घेत निलंबनाची घोषणा केली.
अबू आझमी काय म्हणाले
अबू आझमी यांनी औरंगजेबला “महान राजा” म्हणत त्याच्या काळाला सुवर्णकाळ म्हटले होते. तसेच, काही भाजप नेत्यांवर जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप केला. या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला. सत्ताधारी आणि विरोधकांनीही आझमींवर कारवाईची मागणी केली. अखेर अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत त्यांना विधानसभेच्या कामकाजातून निलंबित करण्यात आले असून विधानभवनाच्या आवारात प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.
निलंबनाची मागणी वाढल्यानंतर अबू आझमींनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत वक्तव्य मागे घेतले. त्यांनी म्हटले की, त्यांच्या शब्दांचे चुकीचे अर्थ लावले गेले आणि इतिहासकारांच्या मतावर आधारित विधान केले होते. तसेच, कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र, त्यांच्या या स्पष्टीकरणानंतरही विधानसभेतील वाद शांत झाला नाही, आणि अखेर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.