माणगांव तालुक्यातील रेवाळजे येथील कुंडलिका नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने एक मुलगा आणि तीन महिलांचा कुंडलिका नदीत बुडून मृत्यू झाला आहे. चार जणांचे मृतदेह शोधण्यात माणगांव पोलिस ठाणे व बचाव पथक यांच्या अर्थक प्रयत्नानंतर यश आले आहे.
दरम्यान, कुंडलिका नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दिनांक ७ डिसेंबर २०२४रोजी सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास रायगडमधील माणगांव तालुक्यातील रेवाळमध्ये घडली. बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या तीनही महिलांचा मृत्यू झाला. आतापर्यंत यापैकी दोघांचा मृतदेह काही तासातच हाती लागले होते.तर तिसरा मृतदेह हा रात्री उशीरा साडे दहा ते अकराच्या दरम्यान सापडला तर चौथा मृतदेह हा आज दिनांक ८ डिसेंबर २०२४रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास सापडला असल्याची माहिती माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांनी दिली आहे. सिद्येश राजेंद्र सोनार (21), सिद्धी गोपीचंद पेडणेकर (16), काजल सोनार (26) आणि सोनी सोनार (27) असं मृतांची नावं आहेत. मृत सर्वजण नवी मुंबईतील रहिवासी असून शिरवली येथे आजीच्या गावी आले असता हा दुर्दैवी प्रसंग घडला.
हे सर्वजण नदीवर पोहण्यासाठी गेले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. यापैकी सिद्देश सोनार हा मुलगा पाण्यात पडला असता या तीन महिला त्याला चांगली वाचवण्यासाठी पाण्यात उतरल्या. त्यानंतर या चौघांचाही बुडून मृत्यू झाला.
माणगाव उपजिल्हा रुग्णालयात मिळालेल्या दोघांना शव विच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे. . सदरील घटनेचा सखोल तपास माणगांव पोलिस करत आहेत.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.