उरण तालुक्यातील धाकटी जुई गावातील रेशमा अमित घरत व सुजाता मनोज घरत यांनी विविध योजनांच्या आमिषाने नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पागोटे गावातील सुजित तांडेल व त्यांच्या पत्नी हर्षाली तांडेल यांची २० लाख रुपयांची फसवणूक झाली असून, इतर नागरिकांसह एकूण ८५.६० लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे.
रेशमा घरत हिने तांडेल दाम्पत्याला मोठ्या परताव्याचे आश्वासन देत गुंतवणूक करायला लावली. मात्र, ठरलेल्या मुदतीनंतरही पैसे परत न करता धमक्या दिल्या. या प्रकरणी सुजित तांडेल यांनी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तपासात आणखी आर्थिक फसवणुकीचे प्रकार समोर आले. भुमिका गावंड हिची ४० लाखांची, परी घरत व मालती घरत यांची २५.६० लाखांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे उरण पोलीस ठाण्यात रेशमा घरत व सुजाता घरत यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४०६, ५०६, ३४ तसेच महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत शेंडगे करीत आहेत.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.