मंत्री आदीती तटकरे, माजी आ. अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून उडदवणे, मालसई, मुठवली या भागात विकास गंगा आणली. नवीन विकास पर्व या भागात सुरु झाला आहे. खारापटी पिंगळसई ते खांब पर्यंत रस्ता उत्तम प्रकारे करण्यात आले आहे. मागे वळुन पाहायचे नाही.आता विकासाचे दिवस आपलेच आहेत. १०० टक्के कामे होणार हा विश्वास नागरीकांत आहे. ही आपली माणस भेटली तर वेगळा समाधान मला वाटतो. राज्यसरकारच्यावतीने लाडकी बहीण योजना आणली, राज्यसरकारने शेतकऱ्यांचे वीज बील माफ केले, मुलींचे उच्च शिक्षणाचे खर्च राज्य सरकार करणार आहे. लाडकी लेक योजना असे अनेक योजना आज चालु आहेत.त्यामुळे काही झाले तरी राज्यात महायुतीचा सरकार येणार असल्याचे खा.सुनील तटकरे यांनी सांगितले.
गेली अनेक वर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या या गावांना मंत्री अदिती ताई तटकरे, मा.आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विकासाचे शिलेदार खासदार सुनील तटकरे यांच्या कृपाशीर्वादाने रखडलेल्या विकासाला धामणसई पंचक्रोशीत गती मिळाली असल्याने परिसरातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. खऱ्या अर्थाने विभागाला विकासाची गंगा वाहत असल्याने केलेल्या विकास कामांचे लोकार्पण तसेच अधिकच्या विकास कामांचे भूमिपूजन लोकनेते खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायत मालसई हद्दीतील मुठवली, सांगडे व उडदवणे गावांतील विविध विकास कामांचा भुमीपुजन व उद्घाटन सोहळा कोकण विकासाचे शिलेदार लोकनेते खा.सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी खासदार तटकरे बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर, तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर, सरपंच मयुरी तुपकर, उपसरपंच निलेश मालुसरे, अनंत थिटे, नवनीत डोलकर, महेश बामुगडे, महेश तुपकर, घनश्याम कराळे, संजय तुपकर, अरविंद मगर, सुशील खांडेकर, मारुती तुपकर, चंद्रकांत शिंदे, विठोबा तुपकर, योगेश शिंदे, सौ.कविता शेळके, गणेश गोपाळ शिंदे, लिंबाजी शेळके, हेमंत कडव, निलेश जंगम, विभागातील मान्यवर ,ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी महेश तुपकर यांनी आपल्या प्रास्ताविकात बोलताना सांगीतले की खा.सुनील तटकरे, महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे, व माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यावतीने या विभागात प्रचंड प्रमाणात विकास कामे झाली असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत, जय भवानी मित्र मंडळ, मुठवली, भजन मंडळ यांच्या वतीन खा.सुनील तटकरे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार मरवडे यांनी केले असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.