एकूण ९४ हातरीक्षांचे परवाने असलेल्या श्रमिकांच्या हाती अवघ्या वीस ई रिक्षा आल्याने उर्वरित ७४ परवानाधारक हातरीक्षांच्या बदल्यात या सर्व ७४ मालकांना ई रिक्षा मिळावी जेणेकरून स्वातंत्र्यानंतरही सुरू असलेली ही अमानवीय प्रथा कायमस्वरूपी संपुष्टात येऊ शकते. सद्यस्थितीत या वीस ई रिक्षांची संख्या कमी असल्यामुळे या वीस ई रिक्षाच्या मालकांना त्यांच्या अपेक्षे पेक्षाही अधिक उत्पन्न दिवसभरात या माध्यमातून नियमितपणे प्राप्त होत आहे. त्यामुळेच अन्य हातरीक्षा मालकांना सुध्दा आता या ई रिक्षा मिळाल्या पाहिजेत यासाठी हे मालक सर्व श्रमिकांना सोबत घेऊन दि.१४ जानेवारी पासून बेमुदत उपोषण करण्याचं जवळजवळ या श्रमिक संघटनेने निश्चित केले आहे.
हे त्यांचे आंदोलन त्यांच्या न्यायहक्कांसाठी योग्य असले तरी सुद्धा ज्या शालेय विद्यार्थ्यांना, जेष्ठ नागरिक, आबालवृद्ध पर्यटकांना ही सेवा उपलब्ध व्हावी यासाठीच ई रिक्षाला परवानगी देण्यात आली आहे. परंतु रिक्षा संघटनेने हातरीक्षा आणि ई रिक्षा बेमुदत बंद ठेऊन उपोषण करण्याचा निर्धार केल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना,पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. मुख्यत्वे ज्या पालकांचा ह्या सेवेस अगोदर पासून प्रखर विरोध होता तीच पालक मंडळी ई रिक्षाच्या सेवेचा लाभ घेण्यासाठी अग्रेसर आहेत. त्यामुळेच यदाकदाचित ई रिक्षा सुरू ठेऊन संघटनेने बेमुदत उपोषण करण्याचे निश्चित केल्यास जी विरोधक लोक आहेत.
यामध्ये काही राजकीय पक्षांची धूर्त मंडळी सुध्दा आहेत जे सर्वधिक या सेवेचा लाभ उठवत आहेत अशा लोकांचे ई रिक्षाला पूर्णपणे समर्थन असल्याचे लेखी पत्र संघटनेने जमा करून ही सेवा अविरतपणे सुरू ठेवावी. ई रिक्षा बंद करून उपोषण करावे असे कुणाही स्थानिकांना वाटत नसून ह्या उपोषणाला काही राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा पाठींबा वगळता सर्वांचा जाहीर पाठींबा आहे.
——————————————————
ई–रिक्षाच्या प्रत्येक आंदोलनात प्रत्येक वेळेस शाळांचे विद्यार्थी व ह्या सेवेला समर्थन असणाऱ्या पालकांनी पाठींबा देऊन सहभाग नोंदवला होता. आणि यापुढेही तो राहील तसेच ई-रिक्षा चालु झाल्याने विद्यार्थ्यांचा आरोग्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत.आणि त्यांच्यातील अभ्यासातील क्षमताही वाढली आहे.चालु होणाऱ्या परीक्षा लक्षात घेता या उपोषण काळात शालेय विद्यार्थ्यांना यातुन वगळावे किंवा पालीकेने मुलांसाठी पर्यायी व्यवस्था करावी.
…भास्करराव शिंदे, पालक (ई रिक्षा समर्थक )
—————————————————–
इ रिक्षा आता माथेरान मध्ये सर्वांचीच गरज आहे असे मागील काळात दिसून आले आहे तरीही काही जण छुप्या पद्धतीने ई रिक्षाना अप्रत्यक्षपणे विरोध करीत असताना राजकारण करत असल्याचे समोर आले आहे त्यामुळे या उपोषण काळामध्ये संघटनेने अशा व्यक्तींकडून ई रिक्षा समर्थनार्थ लेखी स्वरुपात पत्रे घेऊन त्यांनाही जनतेसमोर संघटनेने आणावे.
…मिलिंद कदम, पालक ( ई रिक्षा समर्थक )
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.