कर्जत शहरातील भिसेगावातील आदिवासी वाडी ही सुमारे चाळीस वर्षांपासून अस्तित्वात असल्याने, मात्र शासनाची एकही योजना त्यांच्या पर्यंत पोहचली नसल्याने व त्यांना राहण्यासाठी हक्काचे घर तसेच शबरी सारखी योजना असताना त्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने हक्काच्या योजने पासुन वंचित राहिलेल्या आदिवासी बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी मंगळवार दि. २६ मार्च रोजी दुपारी २ वाजता नगरपरिषद प्रशासनाचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्याकडे घरकूल शबरी योजनेचा लाभ द्या अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू असे निवेदन दिल्याने, निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेत प्रशासनाच्या आधिकारीवर्गानी थेट आदिवासी वाडी मध्ये जात आदिवासी बांधवांची भेट घेतली आहे.
कर्जत शहरातील भिसेगावातील आदिवासी वाडी ही सुमारे चाळीस वर्षांपासून अस्तित्वात असल्याने, मात्र शासनाची एकही योजना त्यांच्या पर्यंत पोहचली नसल्याने व त्यांना राहण्यासाठी हक्काचे घर तसेच शबरी सारखी योजना असताना त्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने हक्काच्या योजने पासुन वंचित राहिलेल्या आदिवासी बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी मंगळवार दि. २६ मार्च रोजी दुपारी २ वाजता नगरपरिषद प्रशासनाचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्याकडे घरकूल शबरी योजनेचा लाभ द्या अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू असा निवेदनातून इशारा आदिवासी बांधवांकडून देण्यात आला आहे. सदर निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेत प्रशासनाच्या आधिकारीवर्गानी थेट आदिवासी वाडी मध्ये जात आदिवासी बांधवांची भेट घेतली आहे.
यावेळी कर्जतचे तहसीलदार शितल रसाळ, तसेच कर्जत नगर परिषदचे मुख्याधिकारी वैभव गारवे, यांनी आदिवासी वाडीतील समस्या जाणून घेतली. यावेळी आदिवासी वाडीमध्ये ज्या समस्या आहेत.आदिवासींची घरे नावावर करण्याबाबत शबरी योजना राबविणे ,विधवा महिलांना तसेच वृद्ध यांना पेन्शन (संजय गांधी निराधार) योजना व ज्या काही शासकीय योजना आहेत ते या आदिवासी बांधव व महिलांसाठी राबविण्यात यावे. तसेच जातीचे दाखले त्यांना तात्काळ देण्याचे व आदिवासी वाडीमध्ये गटारे,पाणी, रस्ते, विद्युत पोल यांचे कामांची पूर्तता करण्यात यावी. अशी विनंती आदिवासी बांधवांनच्या वत्तीने करण्यात आली. तर आदिवासी वाडीमध्ये गटारे,पाणी, रस्ते, विद्युत पोलांची कामे करून देण्याबाबत आश्वासन हे अधिकारीवर्गा कडून देण्यात आले. यावेळी जे आश्वासन मिळाले आहे. ते लेखी स्वरूपात देण्यात यावे अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुळकर्णी यांनी केली व त्यानुसार जर लोकसभा निवडणूक होण्याच्या आधी जेवढी कामे करता येईल ती करून द्या. तरच आम्ही मतदान करू. नाहीतर जो पर्यंत कामे होणार नाही तो पर्यंत मतदानावर आमचा बहिष्कार असेल. असे आदिवासी बांधव व सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुळकर्णी यांच्या कडून सांगण्यात आले आहे. यावेळी भेटी दरम्यान भिसेगाव आदिवासी महिला बांधव तसेच गुंडगे गावातील आदिवासी महिला बांधव उपस्थित होते.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.