आता ‘लाडकी बहीण योजना’ चे तपासले जाणार कडक निकष; नावावर घबाड असणार्‍यांचाही पत्ता होणार कट

Ladaki Bahin
मुंबई : 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ठरली होती. या योजनेअंतर्गत महिलांना सुरुवातीला दरमहा 1500 रुपये देण्यात येत होते, परंतु निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने यामध्ये वाढ करून 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.
तथापि, यामुळे राज्याच्या तिजोरीवर तब्बल 18 हजार कोटींचा आर्थिक बोजा पडत असल्याने आता सरकारने या योजनेबाबत निकष कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणते निकष तपासले जाणार?
1. उत्पन्नाचा दाखला
2. आयकर प्रमाणपत्र
3. मिळणारे निवृत्तीवेतन
4. चारचाकी वाहनांचे मालक असणे
5. पाच एकरपेक्षा अधिक जमीन असणे
फक्त दोन लाडक्या बहिणींनाच लाभ
नव्या अटींनुसार, एका कुटुंबातील केवळ दोन महिलांच्या खात्यातच पैसे जमा केले जाणार आहेत. याआधी दोन कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता, परंतु कडक निकषांमुळे लाभार्थ्यांची संख्या निम्म्यावर येईल असा अंदाज आहे.
आर्थिक स्थितीचा विचार
महायुती सरकारच्या लोकप्रिय घोषणांमुळे आर्थिक तुटवडा जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे निकष तपासूनच रक्कम देण्यात येईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading