ईडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे ही म्हण इतिहास जमा झाली आहे सध्या बळीराज्यावर या ना त्या कारणांनी अनेक संकट ओढवली जात आहे अनेकांची भूक भागवणारा सदैव अन्य धान्य पुरविणारा बळिराजा शेतकरी गेली तीन दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे अक्षरशः मेटाकुटीला आला आहे शेतात मोत्यावाणी पिकलेली कणस भिजके धान पाहून त्याच्या डोळ्यात अश्रूंचे पाठ वाहत आहेत.तर वीज पुरवठा खंडित होत आहे विजेचा सावळा गोंधळ सूरच त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
रोहा तालुक्यालागला अवकाळी पावसाने झोडपून काढले.गेली तीन दिवस अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने त्यामध्ये आंबा, काजू फळ बागायतदार तसेच ऐन रब्बी हंगामातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यांचे शेतात भिजके धान पाहून डोळ्यातून अश्रूंचे पाठ वाहत आहेत त्यामुळे तो मोठा संकटात सापडला आहे तसेच विटभट्टी व्यावसायीकांचे देखील मोठे नुकसान झाले असून त्याच्यावर देखील संक्रांत ओढवली आहे. रोहा तालुक्यातील अंतिम टप्प्यातील दुबार भात पीक झोडणी मळीनेचे काम सुरू असतानाच अवकाळी पाऊस धडकला तर पीक घेणारे वरसगाव, तीसे, तळवली,चिंचवली,पुगाव, पूई, गोवे, मुठवली, शिरवली,या परिसरातील शेतकऱ्यांचे भात पिकांचे खूप नुकसान झाले आहे तर तालुक्यात कोलाड परिसरातील काही ठिकाणी कोलाड,गोवे,खांब, देवकान्हे, या परिसरात वीट थापायचे काम शेवटच्या टप्प्यात असताना अवकाळीने जोरदार बरसात केल्याने कच्च्या वीटा मातीमोल झाल्या आहेत. त्यामुळे वीटभट्टी व्यवसाय मोठ्या विवंचनेत सापडले आहे.
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार रायगड जिल्ह्यामध्ये मंगळवार,बुधवार, आणि गुरुवारी अवकाळी पाऊस कोसळला. या पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. अनेकांच्या घरांची पडझड झाली असून, आंबा, सुपारी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वीटभट्टी व्यावसायिकांनादेखील त्याचा फटका बसला. अवकाळी पावसामुळे प्रचंड हानी झाल्याने आंबा उत्पादक तसेच शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या पावसात सुमारे २६५.९ हेक्टर क्षेत्रातील आंबा पिकाचे, तर ४० हेक्टरवरील उन्हाळी भातशेती बाधित झाली असल्याचे दिसून येत आहे.
तर काही दिवसांपासून उष्णता वाढीत झालेल्या बदलामुळे सर्वजण हैराण झाले होते. प्रचंड तापमानामुळे शरीरातून घामाच्या धारा निघत असतानाच अचानकपणे अवकाळी पावसाने जोरदार सुरूवात केली. त्यामुळे सर्वत्र गारावा निर्माण झाला. मात्र, शेतकरी,वीटभट्टी मालकांची आपल्या कच्च्या वीटा वाचविण्यांसाठी तसेच काही ठिकाणी लग्न सराईत लग्नाची लगीन घाईत धूम सुरू असलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती.
तालुक्यातील कोलाड खांब परिसरात मंगळवारी रात्री च्या सुमारास तसेच बुधवारी आणि गुरुवारी देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस बरसल्याने अनेक ठिकाणी भातशेतीचे व विट भट्टी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत असल्याने विजेचा खेळ खंडोबा सुरूच असल्याने पाऊस ऊन त्यामुळे मोठी उष्णता वाढली असल्याने येथील नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत त्यावर अधिक उपाय योजना करण्यात यावी तसेच शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची तसेच विटभट्टी व्यावसायिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी तसेच व्यावसायिक फळबागायतदार यांच्या कडून केली जात आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.