सद्यपरिस्थितीत संपुर्ण महाराष्ट्रभर अवकाळी पावसाने तडाखा उठवला आहे. या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू इत्यादी फळझाडांसह वीटभट्टी व्यावसायीकांचे देखिल मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक ठिकाणी कच्च्या मातीच्या विटा अवकाळी पावसाने विरघळल्याने वीटभट्टी मालक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
संपुर्ण रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यांत शुक्रवारी दुपारपासूनच जोरदार वारे वाहू लागले होते. तर सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. याच दरम्यान संपूर्ण नागोठणे परिसराला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे ग्रामीण भागात शेतीपुरक असलेल्या वीटभट्टी व्यावसायीकांचे मोठे नुकसान होऊन त्यांनाही आर्थिक फटका बसला आहे. वीटभट्टी भाजण्याच्या तयारीत असलेल्या तसेच तयार करुन ठेवलेल्या कच्च्या मातीच्या विटा अवकाळी पावसाने विरघळ्यामुळे वीटभट्टी मालक मोठ्या संकटात सापडले आहेत. शेती व्यावसायाला पुरक व्यवसाय म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतात वीटभट्टीचा व्यवसाय करतात. पंरतु या अवकाळी पडलेल्या पावसामुळे अक्षरशः वीटभट्टी व्यावसायीकांच्या डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे.
दरम्यान या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायीकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून व्यावसायिक आर्थिक संकटात सापडला असल्याने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे शासनाने करावेत व वीटभट्टी व्यावसायीकांना भरपाई म्हणून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी वीटभट्टी व्यावसायीकांकडुन केली जात आहे. मात्र अशा प्रकारे अनेकदा अवकाळी पाऊस पडला आहे. पंरतु अद्यापही शासनाने वीटभट्टी मालकांची नुकसान भरपाईची मागणी करुनही वीटभट्टी व्यावसायीकांना नुकसान भरपाईबाबत लाल कंदीलच दाखवल्याचे समजते.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.