गेली काही दिवस विविध ठिकाणी पडणारा अवकाळी पाऊस .i. बुधवार ,गुरुवार . या दोन दिवस महाड मध्ये दाखल झाला. जोरदार पावसाने हजेरी लावल्याने आंबा उत्पादकांचे चांगलेच नुकसान झाले आहे.
राज्यामध्ये गेले अनेक दिवस काही ठिकाणी अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. महाड तालुक्यामध्ये देखील गेली दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यामुळे पावसाचे आगमन होणार याची चाहूल सगळ्यांनाच लागली होती.
आज दुपारनंतर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे वातावरण काहीसे थंड झाल्याने प्रचंड उष्म्यातून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अवकाळी पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे मात्र चांगलेच हाल झाले.
या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील वीट उत्पादकांचे चांगलेच नुकसान झाले आहे. दोन दिवस पाऊस पडण्याची चिन्ह दिसू लागल्यानंतर वीट उत्पादक आणि अंबा उत्पादकांमध्ये एकच चिंता निर्माण झाली होती.
आज दुपारनंतर पडलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे आणि वीट उत्पादकांचे नुकसान झाले आहे. गेली काही दिवस तालुक्यामध्ये प्रचंड उष्मा निर्माण झाला होता या उष्णतेतून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी पावसानंतर उष्मा वाढण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे.
Leave a Reply
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.