अलिबाग -रेवदंडा मार्गावर वाहतुक कोंडी; ट्रफिक जॅमने पर्यटकांचे बेहाल

अलिबाग -रेवदंडा मार्गावर वाहतुक कोंडी; ट्रफिक जॅमने पर्यटकांचे बेहाल
अलिबाग ( अमुलकुमार जैन ) :  
नाताळ सुट्टी तसेच वर्षाअखेरची मौजमज्जासाठी समुद्र किनाराचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी प्रचंड संख्येने पर्यटक अलिबाग ते मुरूड पट्टामध्ये हजेरी लावली असून पर्यटकांच्या वाढत्या वाहनांचा ताण अलिबाग ते रेवदंडा मुख्यः रस्तावर पडला असून या रस्तावर मिनिटागणीत वाहतुक कोंडीस सामोरे जावे लागत असून ट्रफिक जॅमने पर्यटकांचे बेहाल झाले. 
अलिबाग ते रेवदंडा दुर्तफा बागायती मधून निघणारा हा रस्ता अरूंद, चिचोंळा तसेच वळणाचा आहे. या रस्ताने रेवदंडा,चौल,नागाव व मुरूड तालुक्यातील  पर्यटनाकडे जा-ये करणारी लहान मोठी विविध वाहनांची ऐन सुट्टीने रेलचेल मोठया प्रमाणात वाढली आहे. वाढत्या वाहतुकीने या रस्त्याला वाहतुक कोंडीस सामोरे जावे लागत आहे. परिणामी पर्यटकांची वाहने  रस्त्याच्या वाहतुक कोंडीच्या विळख्यात खुप वेळ अडकून पडल्याने पर्यटकांचे बेहाल झाले. 
थेट अलिबागहून निघालेली पर्यटकांच्या वाहनांना कुरूळ येथेच ट्रफिक जॅम समस्येला सामोरे जावे लागले. यामध्येच सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ता दुरूस्तीची कामे या दिवशीच काढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. कुरूळ येथे वाहनांची लांबचलांब लाईन लागलेली दिसत होती. त्यानंतर आक्षी स्तंभ येथे सुध्दा अरूंद रस्ताने वाहतुक कोंडी झाली होती. पुढे नागाव शिवाजी महाराज पुतळया समोरील मुख्यः रस्ताला नागाव बीच कडून ये-जा करणारी वाहनांचा अडथळा निर्माण होत होता, त्यामुळे तेथे सुध्दा मिनिटागणीत वाहतुक कोंडी दिसून येत होती.
नागाव हटाळे बाजारपेठेतील अरूंद रस्ताने दोन मोठी वाहने जा-ये करताना समस्या निर्माण होवून तेथे सुध्दा वाहतुक कोंडी दिसत होती. त्यानंतर श्री शारदा पेट्राल पंप, वरंडे फाटा, चौल पिरांचे देउळ, चौल नाका ते थेट रेवदंडा बाजारपेठेतील रस्ताला मिनिटागणीत वाहतुक कोंडीस सामोरे जावे लागत होते. पर्यटकांच्या वाढत्या वाहनांचा भार अलिबाग-रेवदंडा  मुख्यः रस्ताला  पेलवत नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत होते. सध्या नाताळ सुट्टी, शनिवार,रविवारची सुट्टी तसेच  आगामी सरते वर्ष यामुळे पर्यटकांची संख्या मोठया प्रमाणात या ठिकाणी वाढली आहेत, अलिबाग ते रेवदंडा पट्टातील सर्वच हॉटेल,रिसार्ट हाउसफुल्‍ल झाले असल्याचे चित्र दिसते. 
अलिबाग ते रेवदंडा या मुख्यः रस्ताला वारंवार होत असलेल्या वाहतुक कोंडीची समस्या लवकरात दुर करावी व पर्यटकांचे पर्यटन सुखदायक व्हावे यासाठी अलिबाग ते रेवदंडा हा मार्ग समुद्र किनारी बाजूने नव्याने अस्तित्वात असावा अशी विचारसरणी जोर धरू लागली आहे. अलिबाग व आक्षी साखर तसेच नागाव ते थेरोंडाया  समुद्र खाडीवर खाडीपुल उभारल्यास अलिबाग ते रेवदंडा हे अंतर कमी होउन पर्यटनक्षेत्राचा आणखीच विस्तार होईल व परिसरातील पर्यटन वाढेल असे म्हटले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading