शिवजयंतीचे औचित्य साधून गावदेवी जोहे व वैकुंठदादा पाटील मित्र मंडळाकडून अटल करंडक २०२५ प्रकाश झोतातील क्रिकेट सामन्याचे आयोजन जोहे येथील जय गीरोबा मैदानावर करण्यात आले होते. ढोलताशे व फटाक्यांच्या आतिषबाजीने मान्यवरांचे स्वागत करून स्पर्धेचे शानदार उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी खासदार धैर्यशील पाटील यांनी राजे अनेक झाले, अनेकांनी युद्ध जिंकली पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोरगरीब शेतकरी,स्त्रीया,अबाल,वृद्धांना आधार देण्याचे काम केले. यामुळे राजांची पूजा केली जात असल्याचे सांगितले. आज वैकुंठ पाटील यांनी खेळाडूंसाठी मैदान उपलब्ध करून अटल करंडक क्रिकेट सामन्याचे आयोजन चांगल्या पद्धतीने केले आहे.
अटलजींसारखा विद्वान नेता आपल्या देशाला लाभले हे आपले भाग्य आहे. त्यांच्या नावाने अटल करंडक क्रिकेट सामने भरवण्यात आले असल्याचे प्रतिपादन खासदार धैर्यशील पाटील उद्घाटन प्रसंगी केले.
हमरापूर विभागात प्रथमच प्रकाश झोतातील क्रिकेट सामन्यांचे भव्य दिव्य असे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी जोहे गावातील बाळगुड्डू यांचे खूप मोठे योगदान लाभले आहे.
Leave a Reply
आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.
Javascript not detected. Javascript required for this site to function. Please enable it in your browser settings and refresh this page.
Discover more from Pen News
Subscribe now to keep reading and get access to the full archive.