…अखेर मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; तीन कारणं आली समोर

...अखेर मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार
PEN न्यूज ऑनलाइन टीम :
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. काल रात्री त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती, परंतु २४ तासांतच आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माघार घेण्याची घोषणा केली.
जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्यामागे तीन प्रमुख कारणं सांगितली आहेत:
  • मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येणं शक्य नाही.
  • मित्रपक्षांनी उमेदवारांची यादी पाठवली नाही.
  • आणि एका जातीवर निवडणूक लढवणं अवघड आहे.
जरांगे पाटील यांनी निवडणुकीत कोणाला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला असून, स्वतःचे आंदोलन मात्र सुरु ठेवणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WA_Adv_001-copy

आपण हि बातमी कॉपी करू शकत नाही.

Discover more from Pen News

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading